महाबोधी महाविहार मुक्तीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर केले भव्य धरणे आंदोलन...!

 0
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर केले भव्य धरणे आंदोलन...!

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन...

महाविहारातून पंडितांना बाहेर काढून ते बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणी व्यवस्थापनातून मुक्त व्हावे व ते बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून जगभरातील भिक्खू संघ, भिक्खूणी संघ आणि बौद्ध अनुयायी बुद्धगया येथे उपोषण करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय सोमवारी आज सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली उपासकांनी भव्य धरणे आंदोलन केेले. यामध्ये मोठ्या संख्येने भिक्खू आणि उपासक सहभागी झाले होते.

त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य मंडप टाकण्यात आला होता. विचारमंचावर भन्ते बोधीपालो महाथेरो, भन्ते खेमधम्मो, भन्ते उपगुप्त महाथेरो, भन्ते डॉ. सत्यपाल महाथेरो, भन्ते डॉ. चंद्रबोधी महाथेरो, भन्ते भदंत कश्यप महाथेरो, भदन्त ग्यानरक्षित थेरो, भन्ते नागसेन, भन्ते संघप्रिय, भन्ते राहुल बोधी, भन्ते करुणाबोधी, भन्ते रत्नदीप, भन्ते मंगलबोधी, भन्ते यशोदीप, भन्ते बोधीधी धम्मो यांची उपस्थिती होती. तर सूर्यकांता गाडे, डॉ. प्रमोद दुथडे, प्रा. ऋषिकेश कांबळे, अनिलकुमार बस्ते, शरद जाधव, एस.आर.बोदडे, के.व्ही. दिवेकर, सविताताई अभ्यंकर, रामदास अभ्यंकर यांच्यासह हजारोंच्या उपासक, उपासिका संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भन्ते बोधीपालो उपासकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बुद्धगया येथे बौद्ध अनुयायांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शहरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 'धम्म क्षेत्रात बुध्दगया येथील महाबोधी महाविहार सर्वश्रेष्ठ श्रध्दास्थान आहे. याच ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराची उभारणी केली. जगभरातील बौद्ध अनुयायी दर्शनासाठी बुध्दगयेला येत असतात. मात्र हे पवित्र श्रद्धास्थान ब्राम्हणांनी बळकावले आहे. त्यांचा बौध्द धम्माच्या श्रध्देशी, आचार-विचारांशी, नितीनियमांशी तीळमात्र संबंध नसताना केवळ विदेशातून डॉलर व सोन्याचांदीच्या स्वरूपात मिळणारी दानदक्षिणा हडपण्यासाठी अनधिकृतपणे बौध्द विहार ताब्यात ठेवलेले आहे. तसेच येथील प्राचिन बुद्धमूर्तींना पांडव असल्याचे सांगत येणाऱ्या उपासकांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे ब्राम्हणी व्यवस्थानापनातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बुध्दगया येथे भिक्खूसंघाचे मागील 15 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अनेकांची प्रकृती चिंताजणक बनली आहे. जगभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आंदोलन दडपण्यासाठी बिहार सरकार भिक्खूंना मध्यरात्री उचलून घेऊन जात आहेत. महाविहाराबाबतचा 1949 चा कायदा रद्द करून महाविहार बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी आंदोलनातूून करण्यात आली. यावेळी अनेक भिक्खूंनी आंदोलनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांमार्फत पंतप्रधानांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठविले. आंदोलनासाठी पंडित नरवडे, अशोक आनंदराव, सुनंदा धवन, कस्तुराबाई जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow