उद्या चलो मुंबई, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे प्रमुख मागण्या काय आहेत...!

 0
उद्या चलो मुंबई, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे प्रमुख मागण्या काय आहेत...!

उद्या चलो मुंबई, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे प्रमुख मागण्या काय आहेत...!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) उद्या सकाळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीचा ताफा मुंबईकडे निघणार आहे. या रॅलीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या रॅलीत राज्यातील हजारो लोक हातात तिरंगा झेंडा घेत शेकडो गाड्यांनी मुंबईत शांततेत दाखल होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

काय आहेत तिरंगा रॅलीच्या प्रमुख मागण्या...

मुस्लिम समाजाविरोधात घडत असलेल्या निंदनीय घटनेविरोधात कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना घडू नये आणि समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधुभाव धोक्यात घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी योग्य ती कारवाई सरकारने करावी यासाठी हि तिरंगा रॅली काढण्यात येत आहे.

रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, या.सिन्नर, जिल्हा नाशिक याठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर प्रेषित मोहम्मद पैगंबर(स.अ.व.स.) यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम धर्मांची व धर्मगुरुची प्रतिमा मलिन होईल आणि दोन समाजात मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरविण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात 60 हून जास्त गुन्हे दाखल झाले असून त्यांना तात्काळ अटक करावी. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भयाचा म्हणून जाणूनबुजून प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषण करत असलेले नितेश राणे यांच्या विरोधात कठोर कारवाई करुन अटक करावी. इस्लामिक धर्मगुरु मौलाना मुफ्ती सलमान अझहरी साहाब यांच्या विरोधात विविध प्रकारचे षडयंत्र रचून त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली असून त्यांची तात्काळ मुक्तता करावी. भविष्यात कोणत्याही समाजाविरोधात वादग्रस्त, चिथावणीखोर, प्रक्षोभक भाषणे करणारे आणि दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-या विरोधात कठोर कायदा बणवण्यात यावा. महाराष्ट्रात सद्यस्थितीत विविध ठिकाणी अनेक दूर्देवी घटना घडत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये आणि कायद्याची कडक व कठोर अंमलबजावणी व्हावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संविधानाची प्रत देण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिध्दीपत्रकात इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow