शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही - अंबादास दानवे
शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही - अंबादास दानवे
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी शिंदे गट व भाजपावर टिका करत सांगितले देशात हुकूमशाही सारखे चित्र आहे. देशात लोकशाही टिकली पाहिजे लोकांना मोकळा श्वास घेतला पाहिजे. राज्यात 48 लोकसभा जागेवर शिवसेनेची चाचपणी सुरू आहे. संघटना बांधणीवर जोर आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. शिवसेनेचे टार्गेट भाजपा आहे. शिंदे गटाचा एकही खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येणार नाही असेही ते म्हणाले. मुंबई सिनेट निवडणूक रद्द केल्याने त्यांनी सरकारवर टीका केली. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिनेट निवडणूकीसाठी तयारी केली असताना ठाकरे गटाचे मुंबई विद्यापीठात वर्चस्व आहे मागिल निवडणुकीत दहाचे दहा जागा निवडून आले होते यावेळी सुध्दा तीच परिस्थिती होती पण सरकार निवडणूका घेण्यास घाबरत असल्याची टिका दानवेंनी केली.
What's Your Reaction?