आक्रोश मोर्चा, इम्तियाज जलिल यांच्या अटकेसाठी चार दिवसांचा अल्टिमेटम...!

इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी दलित समाज एकवटला, शहरात काढला प्रचंड जनआक्रोश मोर्चा
आंबेडकरी नेत्यांनी पोलिसांना दिला चार दिवसाचा अल्टिमेटम
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) :
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे परंतु पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही त्यांना अटक करावी या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आज काढलेल्या जन आक्रोश मोर्चाच प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चामुळे पूर्ण शहर दणाणून गेले होते. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाबद्दल बंदी असलेल्या शब्दाचा वापर करून बौद्ध समाजाचा अवमान केला. त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही त्यामुळे दलित समाजामध्ये संतप्त भावना आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने शहरात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बरोबर 1.30 वाजता क्रांतीचौकी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाला सुरुवात झाली असली तरी बौद्ध बांधवांचे क्रांती चौकाकडे येत असल्याचे दृश्य दिसून येत होते. हजारो तरुण, तरुणी, महिला, वृद्ध यांच्या हातात निळे झेंडे आणि एकजुटीने लढू या इम्तियाज जलील यांना अटक करा, तडीपार करा अशा विविध घोषणांचे फलक त्यांच्या घेऊन मोर्चेकरी भडकल गेट कडे निघाले. उघड्या वाहनावर काही नेते उभे राहून इम्तियाज जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. यांच्यापाठोपात मोर्चामध्ये सहभागी झालेले आंबेडकरी अनुयायी जोरदार घोषणाबाजी करीत होते. सिल्ल्लेखाना गुलमंडीवर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चेकर्यांचा उत्साह आणखीन वाढला. या मोर्चाचं एक टोक क्रांती चौक ते दुसरे टोक गुलमंडीपर्यंत होते. अतिशय शिस्तीत निघालेला मोर्चा गुलमंडी औरंगपुरा मार्गे मोर्चा भडकल गेटे येथे पोहोचला. त्यातच रिमझिम पाऊस सुरू झाला. पावसातही मोर्चेकरांचा उत्साह कमी झाला नाही भडकल गेट येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी एक भव्य स्टेज उभारण्यात आले होते या ठिकाणी रिपाईचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, अरुण बोर्डे, जालिंदर शेंडगे, अमित भुईंगळ, सतीश पटेकर, विजय जोंधळे, अफसर खान, संजय ठोकळ, बाळासाहेब सानप यांची भाषणे झाली. आंबेडकरी समाजाच्या मतांवर इम्तियाज जलील हे आमदार व खासदार झाले परंतु त्याच समाजाला ते बेईमान झाले. आता तर आंबेडकरी समाजाविषयी त्यांनी अपशब्द काढला म्हणून त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी त्यांना चार दिवसात अटक करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व दलित नेत्यांनी यावेळी दिला.
मोर्चामध्ये शहरातील सर्व दलित वसाहती आणि जिल्हाभरातून हजारो संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. मोर्चामध्ये रिपाईचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, जालिंदर शेंडगे, अरुण बोर्डे, मिलिंद शेळके, अफसर खान, किशोर थोरात, अमित भुईगळ, विजय मगरे बाळासाहेब सानप, प्रा. सुनील मगरे, संजय ठोकळ, रुपचंद वाघमारे, विनोद बनकर, अशोक भातोडे, मनोज शिरीन, जयप्रकाश नारनवरे, बाळकृष्ण इंगळे, अशोक हिवराळे, बबन नरवडे, गौतम दाभाडे, सचिन बनसोडे, सतीश गायकवाड, सतीश पाटेकर, भगवान रगडे, राहुल सोनवणे, रविकुमार तायडे, अंजन साळवे, लक्ष्मण हिवराळे, लक्ष्मण शिंदे, दीपक निकाळजे, चंद्रकांत हिवराळे, विशाल दाभाडे, सुनील कोतकर, समीर जाधव यांच्यासह हजारो आंबेडकरी अनुयायी मोर्चात सहभागी झाले होते.
पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास..
आज आंबेडकरी अनुयायांचा शहरात भव्य मोर्चा निघणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने मोर्चा मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. क्रांती चौक कडे येणारा जालना रोड काही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सिल्लेखान्याकडून क्रांतीचौक कडे जाणारा रस्ता ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा मार्ग अवलंबावा लागला. मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात होते. त्यांच्या सोबतच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. परंतु मोर्चा मध्ये एवढी गर्दी असूनही मोर्चा शिस्तीत भडकल गेट पर्यंत पोहोचला. मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. भडकल गेट येथून दोन रुग्णवाहिका जात होत्या त्यास मोर्चेक-यांनी वाट मोकळी करून दिली. मोर्चा अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मोर्चेंकरांसाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय..
मोर्चामध्ये शहरासह जिल्हाभरातून हजारो संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. विविध वाहनातून ते शहरात आले होते. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीने शहरातील ठिकठिकाणी केली होती. मोर्चामध्ये हजारो अबाल वृद्ध महिला, पुरुष व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोयी होऊ नये म्हणून कृती समितीच्या वतीने मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
What's Your Reaction?






