काँग्रेसने पदयात्रा काढून साजरा केला वर्धापन दिन

 0
काँग्रेसने पदयात्रा काढून साजरा केला वर्धापन दिन

काँग्रेसने पदयात्रा काढून साजरा केला वर्धापन दिन

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडों यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिना निमीत्त औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे पदयात्रा काढण्यात आली. हि पदयात्रा सराफा मार्केट महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करून शहागंज मार्गे नफरत छोड़ो भारत जोडो अशा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला व शहागंज चमन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयास अभिवादन करुन पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे सभा घेण्यात आली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी अॅड. मुजाहेद खान, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. कल्याण काळे आणि औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी मार्गदर्शन केले.

माजी शहर अध्यक्ष इब्राहीम पठाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण पाटील डोणगांवकर, महिला अध्यक्षा दिपाली मिसाळ, अनुसुचित जाती विभागाचे डॉ. अरुण शिरसाठ युवक, कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे, अनिस पटेल, विनोद तांबे, डॉ. पवन डोंगरे, महेंद्र रमंडवाल, संदिप बोरसे, शेख कैंसर बाबा, निमेश पटेल. मसरुर सोहेल खान, इद्रिस नवाब खान, मुददसिर अन्सारी, रवि लोखंडे, सलीम खान, सय्यद फयाजोददीन बरखा विंचरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow