नामांतरावरावर सुनावणी झाली उद्याही होणार, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

 0
नामांतरावरावर सुनावणी झाली उद्याही होणार, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नामांतरावर सुनावणी झाली उद्याही होणार, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई, दि.(डि-24 न्यूज)

मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी 4.30 वाजेपर्यंत औरंगाबाद शहराच्या नामांतरावरावर न्यायालयासमोर सुनावणी झाली. उद्याही सुनावणी होणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले औरंगाबाद शहर व उस्मानाबाद शहर नामांतरावरावर आजची सुनावणी झाली.

औरंगाबाद नामांतर विरोधात याचिकाकर्ते यांचे वकीलांनी शहराची ऐतिहासिक ओळख, पर्यटनाचा वारसा लाभलेल्या व केंद्र शासनाच्या गाईडलाईन नुसार शहराचे नाव बदलता येणार नाही या निर्णयाला या.उच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी असा युक्तिवाद केला.

एड मुशाला यांनीही जास्त वेळ युक्तिवाद करुन आपली बाजू मांडली. उद्या शासनाच्या वतीने अधिवक्ता बिरेंद्र सराफ हे बाजू मांडतील. न्यायालयात मुख्य याचिकाकर्ते मुश्ताक अहेमद व हामद चाऊस उपस्थित होते. त्यांनी विश्वास व्यक्त केला की न्याय मिळेल.

काल औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका व गावाच्या नावावर सुनावणी झाली पण न्यायालयाने तो निकाल राखून ठेवला आहे.

आज झालेल्या औरंगाबाद शहर व उस्मानाबाद शहर नामांतरावरावर सुनावणी झाली. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव शासनाने केले आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

तारीख पे तारीख सुरू होती आता सुनावणी झाली निर्णयाची अपेक्षा सर्वांना आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow