फुलंब्रीत किरकोळ वादातून युवकाचा खून, चार आरोपी अटक

 0
फुलंब्रीत किरकोळ वादातून युवकाचा खून, चार आरोपी अटक

फुलंब्रीत किरकोळ वादातून युवकाचा खून, चार आरोपी अटक

फुलंब्री, दि.24(डि-24 न्यूज) फुलंब्री येथील टि-पाॅईंट येथे टपरी चालकाचा किरकोळ वादातून आज शुक्रवार रोजी खून करण्यात आला.

या विषयी सविस्तर माहीती अशी की फुलंब्री येथील टि-पाॅईंट येथे नजीर खान मुनीर खान, वय 24 वर्ष, राहणार फुलंब्री यांचा पान टपरीचा व्यवसाय असून शुक्रवार रोजी नित्यनियमाने तो आपला व्यवसाय करत असतांना अज्ञात 8 ते 12 युवक टपरीवर सामान घ्यायला आले त्या वेळी किरकोळ वाद झाला व सदरील तरुणांनी टपरी चालकांवर चाकूने छातीवर बरगाडीत व पोटात असे 3 वर केले यावेळी शेख सुलतान शेख लड्डू हा भांडण सोडायला गेला असता त्यावर सुद्धा चाकूने वर करण्यात आले. सदरील घटना घडल्यानंतर आरोपी पळून जात असतांना सदरील परिसरात असणाऱ्या नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले.

या घटनेत जखमींना छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी नजीर खान मुनीर खान यास मयत घोषित केले. सदरील घटनेनंतर फुलंब्री येथील टि-पाॅईंट परिसरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. परिसरातील सर्व व्यावसायिकांनी

आपली दुकाने बंद केली. घटनेनंतर फुलंब्री पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमाव जमा झाला असता पोलीस प्रशासनाने 4 आरोपी पकडले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण शांतता राखावी असे आवाहन केले आहे.

फुलंब्री पोलीस ठाण्यात सदरील घटनेची रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow