बकरी ईदनिमित्त राज्यातील आठवडी जनावरांच्या बाजारावर बंदी....!

3 जून ते 8 जूनपर्यंत जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे गोवंश आयोगाचे आदेश....
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) 3 जून ते 8 जूनपर्यंत राज्याचे सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र गोवंश आयोग पुणे-67 यांनी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींना बकरी ईद निमित्ताने काढले आहे.
परिपत्रकात म्हटले आहे सन 2025-26 वर्षात दिनांक 7/6/2025 रोजी बकरी ईद हा सण साजरा होणार आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल/कुर्बानी करण्यात येते. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1995 सुधारणा दिनांक 4 मार्च 2015 पासून राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. सदर सुधारित अधिनियमाप्रमाणे गोवंशाची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच या अधिनियमातील कलम 5 अ अन्वय गोवंशाची कत्तल, कत्तलीसाठी वाहतूक, कत्तलीसाठी निर्यात, कत्तलीसाठी खरेदी विक्री, कत्तलीसाठी विल्हेवाट, गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास व राज्याबाहेर कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई आहे.
त्याअनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की, बकरी ईद सणाच्या पार्श्वभुमीवर नजीकच्या आठवड्यात दिनांक 3/6/2025 ते 8/6/2025 या कालावधीत आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचे बाजार भरणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरुन गोवंशाची कत्तल होवून वरिल अधिनियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत सतर्क राहावे असे महाराष्ट्र गोवंश आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे.
What's Your Reaction?






