मजलिसला उखडून फेका, भाजपाला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन

अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला
मजलिसला उखडून फेका, भाजपला निवडून देण्याचे केले आवाहन
काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
भाजपा जागा लढण्याचे दिले संकेत,महायुतीत खळबळ...
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) ज्या प्रकारे निजाम राजवटीला पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपवले तशाच प्रकारे मजलिसला उखाडून फेका काँग्रेसने 40 वर्षात जे केले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात करून दाखवले देशाला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
त्यांनी यावेळी राहुल गांधी, शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज मंगळवारी सायंकाळी अमित शहा यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होती यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, खासदार अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, संजय केनेकर आमदार हरिभाऊ बागडे, खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात अमित शहापुढे म्हणाले 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने 41 जागा भाजपाच्या झोळीत टाकल्या यावेळी मोदींना तिस-यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी 45 हून जास्त जागा निवडून देण्याचे आवाहन केले. एकीकडे एनडीए तर विरोधात इंडिया घमंडीया आघाडी आहे. इंडिया आघाडीत परिवारवादी पक्ष आहे. सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचे तर उध्दव ठाकरे यांना मुलाला, स्टॅलिन यांना मुलाला, ममता बॅनर्जी यांना पुतण्याला मुख्यमंत्री बनवायचे आहे. ज्या काँग्रेसने कलम 370 चा विरोध केला, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार टाकला, राम मंदिराच्या केसला एवढी वर्षे लटकवत ठेवले, ट्रीपल तलाक, सर्जिकल स्ट्राईकला विरोध, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध करणा-यांच्या बाजूला उद्वव ठाकरे बसत आहे. घमंडीया इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे व शरद पवार सोबत आहे त्यांचे पासून सावध राहा व एनडीएला आशिर्वाद द्या व चारशे पार जागा विजयी करुन देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे यावेळी आपल्या भाषणात त्यांनी कळकळीचे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसवर टीका करत राहुल गांधी यांना पप्पू म्हणाले, शरद पवार व उध्दव ठाकरे यांना उद्देशून सांगितले 2004 ते 2014 पर्यंत युपिएची सत्ता होती दहा वर्षांत महाराष्ट्रासाठी 1 लाख 91 हजार कोटी विकासासाठी दिले त्यांच्या तुलनेत मोदी सरकारने नऊ वर्षांत चार पट 7 लाख 15 हजार 890 कोटी निधी दिला तर 8 लाख कोटींचे विकासाचे प्रकल्प सुरू आहे. एकूण दहा वर्षांत 16 लाख कोटी दिल्याचा दावा शाह यांनी आपल्या भाषणात केला. दहा वर्षांचा हिशोब मागता तुमचाही हिशोब द्या असे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले.
एनडीएच्या पाठीशी उभे राहा- देवेंद्र फडणवीस
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले नाही तर सरकार अल्पमतात असताना नामांतराचा ठराव मंजूर केला आमचे सरकार येताच पहीलाच निर्णय नामांतराचा घेतला व शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सही करुन मान्यता दिली म्हणून त्यांचे आभार. मागच्या वेळेस जी चूक लोकसभा निवडणुकीत केली ती आता करु नका. एमआयएमच्या खासदाराला निवडून दिले होते त्यांनी कलम 370 हटवण्यासाठी पाठींबा दिला होता का...? राम मंदिर बांधण्यासाठी व मोदींनी केलेल्या कामांचे समर्थन केले होते का...? असा सवाल उपस्थित करत आता चुक न करता मोदींना तिस-यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जो खासदार साथ देईल त्यांनाच निवडून द्या. हिंदूत्वावाचा पडगा घेऊन बहुरुपी येतील त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका असे ठाकरे गटाचे नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात टिका केली.
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात ग्वाही दिली की महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करणार.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचेही भाषण झाले.
व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विजया रहाटकर, खासदार सुजय विखे पाटील, खासदार डॉ.अजित गोपछडे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार राम कदम, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे, शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, केंद्रीय हज कमेटीचे सदस्य तथा अल्पसंख्याक मोर्चाचे नेते हाजी एजाज देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, संजय खंबायते, आरपीआयचे बाबूराव कदम, अनिल मकरीये, राजू शिंदे, राजगौरव वानखेडे, राजेश मेहता आदी
उपस्थित होते.
What's Your Reaction?






