वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात केले राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन, पोलिसांनी केले आंदोलकांना अटक

वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात केले राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन....
आंदोलकांना केले सिटीचौक पोलिसांनी अटक व सुटका
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) वक्फ संशोधन विधेयक जे दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. हा कायदा संविधान विरोधी आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. हा कायदा वक्फच्या जमिनी बळकावण्यासाठी आणला गेला यामुळे हा कायदा सरकारने मागे घ्यावा व विविध मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन त्यानंतर राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हे आंदोलन देशभरात आज एकाच वेळी करण्यात आले. या आंदोलनाला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडिपिआय) व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. ईव्हिएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. महाबोधी महाविहारची मुक्ती करुन बौद्ध अनुयायांना सुपुर्द करावे. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात मुख्य नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. दुपारी दोन वाजता सिटीचौक पोलिसांनी आंदोलकांना अटक करुन कार्यवाही केल्यानंतर सुटका केली.
यावेळी जियाओद्दीन सिद्दीकी, इलियास किरमानी, इंजिनिअर वाजेद कादरी, मौलाना नईम कासमी, प्रतापदादा पाटील, संतोष साळवे, एड शिंदे मॅडम, रंजनाताई कसाब, अलियारखान, दिपक शिंदे, लहु पंचांग, सुरेश वाघमारे, नंदकुमार खोतकर, ज्योती मिसाळ, एसडिपिआयचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पटेल, जिल्हाध्यक्ष साकी अहमद, जिल्हा महासचिव नदीम शेख, सदस्य मोहसीन खान, शेख अजिम, अज्जू लीडर आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?






