शहराच्या पाणी प्रश्नासाठी उबाठाने काढली पदयात्रा....

 0
शहराच्या पाणी प्रश्नासाठी उबाठाने काढली पदयात्रा....

पाणी प्रश्नासाठी शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पदयात्रा...

शिवसेना नेते तथा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) : "लबाडांनो पाणी द्या" या जनआंदोलन अंतर्गत ९ मे रोजी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाणी प्रश्नाबाबत संभाजीनगरात पदयात्रा काढण्यात आली. शिवसेना नेते तथा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरातील मुकुंदवाडी चौक येथून या यात्रेस सुरुवात होऊन अहिल्याबाई होळकर चौक चिखलठाणा येथे या यात्रेचा शेवट झाला. 

मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दानवे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर या पदयात्रेस सुरुवात झाली. साधारणता १५ किलोमीटरच्या आसपास आणि ११ वार्ड मधून ही पदयात्रा गेली. यामध्ये मुकुंदवाडी मेन रोड ते हनुमान मंदिर गाव, देवगिरी कॉलनी ते संघर्ष नगर, रामनगर ते विठ्ठलनगर, तोरणगड नगर ते श्रद्धा कॉलनी -जालना रोड ते चिकलठाणा अहिल्याबाई होळकर चौक या परिसराचा समावेश होता.

या पदयात्रेत शिवसैनिक, महिला आघाडी पदाधिकारी हातात "लबाडांनो पाणी द्या" चे पोस्टर घेऊन सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेले "लबाडांनो पाणी द्या" हे रॅम्प साँग वाजविले जात होते. ज्यामुळे पक्षाची पाणी प्रश्नांवर असलेली भूमिका नागरिकांना समजावून सांगितली जात होती. शिवसेना दिव्यांग आघाडी जिल्हाप्रमुख शाहू चित्ते यांच्यासह पाणी समस्यापासून त्रस्त दिव्यांग नागरिक आपली टू - व्हीलर वाहन घेऊन या पदयात्रेत सहभागी झाले होते. 

१६ मे रोजी शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भव्य हल्ला मोर्चा काढण्याचा आहे. या मोर्चामुळे शासन आणि प्रशासनावर दबाव निर्माण होऊन जनतेच्या मागण्यांसमोर प्रशासन झुकेल. शहराची पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत नसल्याने हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्याचा प्रश्न सोडवून आपल्याला संभाजीनगर येथील जनतेला न्याय मिळवून देण्याचा असल्याचे प्रतिपादन अंबादास दानवे यांनी यावेळी केले. 

याप्रसंगी माजी महापौर भाऊसाहेब वाघ, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे,विजय वाघमारे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे,विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, मनोज गांगवे,नाना जगताप, भाऊसाहेब राहटे, सचिन वाघ,रघुनाथ शिंदे,शाहू चित्ते,सोमीनाथ नवपुते, शिवा बेंद्रे, पंडित आंबेकर, गणेश शेजुळ, राजू राऊत, विजय गावडे, मनोज वाघमारे, सांडू मुरदडे, पंजाब मगर, विजय पाटील, रामेश्वर कोरडे, संजय कोरडे, राजू रोठे, नारायण बरकासे, मोहन गावडे, ओमकार लिंबेकर, अमोल तोरणमल, योगेश जगताप, प्रभू मिठे,भगवान कोकाटे,रुपेश मालाणी, शुभम वाघ,महिला आघाडी दुर्गा भाटी, मनिषा खरे,लता पवार, गौराबाई जाठवे, रुपाली मुंदडा, वैशाली कोरडे, नंदा कोरडे, वर्षा मालकर, मंदा रीठे, कविता डोईफोडे, लता शंखपाळ व शेख सलीमा उपस्थित होते. 

पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात पदयात्रा...

आज ९ मे रोजी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढण्यात येणार असून सकाळी ७ ते १० पर्यंतच्या पदयात्रेस नाईकनगर येथून सुरुवात होऊन माऊलीनगर - अरुणोदय कॉलनी - प्रथमेश नगरी - देवळाई मुख्य रस्ता - छत्रपतीनगर - आयप्पा मंदिर -पांडुरंगनगर- ज्ञानेश्वर नगर - विद्यानगर स्मारक - संभाजीचौक - सातारा गाव मार्गे खंडोबा मंदिर येथे शेवट होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ९ पर्यंत पदयात्रेची सुरुवात रिलायन्स मॉल येथून सुरू होऊन हिंदुराष्ट्र चौक - पहाडे कॉर्नर - जती महारुद्र मंदिर - मातोश्री चौक - हनुमान नगर गल्ली नंबर 3 - आंबेडकर पुतळा - दुर्गामाता चौक - पंडित किराणा - राजे चौक -पुंडलिक नगर पोलीस स्टेशन - विश्रांती चौक गल्ली नंबर 12 मार्गे - संत माऊली शाळा मारुती मंदिर जय भवानी नगर, गल्ली नंबर तीन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समाप्ती होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow