जातीय सलोखा कायम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न गरजेचे - प्रा.सलीम इंजिनिअर
 
                                जातीय सलोखा कायम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न गरजेचे - प्रा.सलीम इंजिनिअर
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) देशातील विविधतेतील एकता टिकवून ठेवण्यासाठी जातीय सलोखा कायम राखने गरजेचे आहे. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.सलीम इंजिनिअर यांनी व्यक्त केले आहे. जातीय सलोखा समितीच्या वतीने देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्या कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष इलियास फलाही, कार्यक्रमाचे संयोजक सलमान मुकर्रम उपस्थित होते.
देशात मोठा धार्मिक कार्यक्रम घेऊन 2024 लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठीचा उद्देश नसावा असे देशातील जनतेला वाटते असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी यावेळी सांगितले आम्हाला वाटते की भारतातील सांप्रदायिक सलोखा मजबूत करणे हे भारतातील लोकांसाठी सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. द्वेष पूर्ण राजकारण, जातीय ध्रुवीकरण आणि धार्मिक अल्पसंख्याकांवरील केंद्रीत हिंसाचारामुळे देशात अल्पसंख्याक समाजात असुरक्षित भावना वाटत आहे. जातीयवाद हा आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाला मोठा धोका आहे. काही लोक आपल्या स्वार्थासाठी भावनिक घोषणांद्वारे ध्रुवीकरण करत आहे. अल्पसंख्याक विरुद्ध द्वेष पसरवत आहेत. दुर्दैवाने अनेक वेळा सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपल्या देशातील जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची वाढ आणि शक्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षात आम्ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांवर स्थापन झालेल्या बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक आणि बहुभाषिक प्रजासत्ताकाची कल्पना केली. विविधतेतील एकता नेहमीच आमची ताकत आहे. जो जातीय सलोख्याच्या संवर्धनातून टिकवून ठेवला पाहिजे. देशातील सर्व स्तरावरील जातीयवाद आणि फॅसिझमच्या धोक्याच्या विरोधात वैयक्तिक आणि सामूहिकपणे लढण्याची वेळ आली आहे. जातीयवादाच्या धोक्यांबद्दल लोकांना प्रबोधन केले पाहिजे. त्याविरुद्ध जनमत एकत्रित केले पाहिजे. लोकांमध्ये प्रेम, सौहार्द, सहिष्णुता आणि विश्वास वाढविला पाहिजे. जमात-ए-इस्लामी हिंद शांतता, न्याय आणि लोकशाहीसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्ती आणि संघटनांना पाठिंबा देऊन जातीय सलोखा विकसित करण्याचे काम करत आहे.
राजकीय लाभ घेण्यासाठी द्वेष पसरविणाऱ्यांचा पराभव करून जमात-ए-इस्लामी हिंद देशातील लोकशाही आणि घटनात्मक मूल्य पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत आपण सर्व भारतीय लोक प्रभाव भुमिका बजावू शकू. आम्हाला आशा आहे की लोकांच्या प्रयत्नाने काळ अधिक चांगला बदलेल.
भारतीय समाज हा बहुवचन समाज आहे. आम्हाला वाटते की एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि परस्पर विश्वास आणि सौहार्द मजबूत करण्यासाठी संवाद आवश्यक आहे. या संदर्भात धार्मिक आणि सामाजिक नेत्यांची भुमिका खूप महत्त्वाची आहे. जमात-ए-इस्लामी हिंद देशभर हा संवाद साधण्यासाठी वेगवेगळे मंच तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार धार्मिक जन मोर्चा आणि सद्भावना मंच विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत. तरुण आणि महिलांसाठीही असेच मंच स्थापन केले जात आहे असल्याचे प्रा.सलीम इंजिनिअर म्हणाले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            