विजेच्या स्मार्ट मीटरला नागरीकांचा विरोध, गुपचूप मीटर बसविण्याचा आरोप, 6 मे रोजी तीव्र निदर्शने

स्मार्ट मीटर सह प्रचंड वीज दरवाढ हाणून पाडण्यासाठी संघटीत होण्याचे भाकपने केले आवाहन... !
6 मे 2025 रोजी तीव्र निदर्शने !
छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) दि.23(डि-24 न्यूज); निवडणूकी पूर्वी घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत असे भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले तरीही कैलास नगर आणि इतर काही भागात गुपचूप स्मार्ट मीटर लावण्याचा प्रकार संताप जनक असून दि. 6 मे 2025 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिल कॉर्नर येथील महावितरण महाव्यवस्थापक कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून कैलास नगर व इतर परिसरातील स्मार्ट मीटर काढून घ्या व शहरात इतर कुठेही लावू नका या मागणी करण्यात येणार आहे.
2015 च्या केंद्र सरकारच्या नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत 2015 ते 2017 या काळात देशात सर्वत्र वीज पुरवठयाचे बील आकारण्या साठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मोदी सरकार 1.0 ने घेतला होता. याची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी पूर्वीच लावण्याचा निर्णय झाला आहे. भारतीय कम्यूनिस्ट पक्ष व इतर अनेकांनी तसेच जनतेनेही विरोध केला.
स्मार्ट मिटर हे प्री पेड अथवा पोस्ट पेड असू शकतात. यात सीम कार्ड असेल. प्रीपेडला पोस्ट पेड आणि पोस्ट पेडला प्री पेड वीज वितरण कंपनी बसल्या जागेवर करू शकेल. प्री पेडला विरोध होतोय म्हणून सरकार व विज वितरण कंपनीने ज्याला पोस्ट पेड हव असेल त्याला पोस्ट पेड मीटर देऊन अशी दिशाभूल करण्यात आली. हे स्मार्ट मीटर कोणत्याही तऱ्हेने लागलेच पाहिजे हे सरकार व विज वितरण कंपनीचे लक्ष्य आहे. पोस्ट पेड ला प्री पेड करणे हे कंपनीच्या एका क्लीक वर रुपांतरीत करता येईल. त्यामुळे प्री पेड नको पोस्ट पेड नको स्मार्ट मीटरच नको अशी भूमिका घेऊन वीज ग्राहकांनी रस्त्यावर उतरून दंड थोपटण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे स्मार्ट ज्या शहरांमध्ये लागले तेथे मीटर वेगाने फिरते, त्यामुळे भरमसाठ वीज बील येऊ लागले असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत, ज्याप्रमाणे मोबाईल रिचार्ज संपल्यावर आऊटगोइंग कॉल बंद होतात त्याचप्रकारे रिचार्ज संपल्यावर वीज पुरवठा बंद होतो , रात्री अपरात्री पाणी पुरवण्याच्या दिवशी कधीही जेव्हा रिचार्ज संपेल त्या वेळेला विज पुरवठा आपोआप बंद होतो , अशा रिचार्ज करण्या शिवाय दूसरा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही
ज्यांच यापूर्वीच महिण्याच वीज बील साधारणतः 2000/- येते म्हणून त्यांनी 2000 / - चे रिचार्ज 8-10 दिवसात संपल्याचे अनुभव अनेक वीज ग्राहकांना आल्याचे अनुभव यू ट्यूब वर पाहावयास मिळतो.
काही लोक एक व्हीडीओ फॉरवर्ड करतात त्यात एक माणूस सांगतो की वीज कायद्या प्रमाणे तुम्हाला न विचारता वीज मीटर बदलता येणार नाही म्हणून तुम्ही अर्ज लिहून आक्षेप घ्या म्हणजे सार्ट मीटर लागणार नाहीत. पण औरंगाबाद आणि इतर काही जिल्ह्यांचा अनुभव वेगळा आहे. 3-4 वर्षापूर्वी घरातले मीटर काढून रस्त्यावरील विजेच्या खांबावर लावण्यात आले त्यावेळी वीज ग्राहकांची परवानगी घेण्यात आलेली नाही. ज्यांनी त्यावेळी विरोध केला त्यांना पोलीस आणून गुन्हे दाखल करण्याचा धाक दाखवून जबरदस्तीने मीटर बदललेही आणि घरातून काढून रस्त्यावरील वीज खांबावर लावण्यात आले. वीज बील थकले की महावितरणचे कर्मचारी येतात आणि वीज कनेक्शन बाहेरच्या बाहेर तोडून निघून जातात.
एप्रिल 2024 मध्ये मागच्या शिंदे फडणवीस पवार सरकारने 30% वीज दरवाढीस भाकप व आयटकने विज नियामक आयोगा समोर विरोध केला परंतू वीज नियामक आयोग ही सरकारच्या हातातील बाहुले असल्याने 30% वीज दरवाढ मंजूर झाली.
स्मार्ट मिटरला वाढता विरोध व भाकप घराघरा पर्यंत पोहचुन वीज ग्राहकांना जागे करीत असल्याचे पाहून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या बैठकीत तो मुद्दा मांडला आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपा विधानसभेत सत्तेत आल पाहिजे हे लक्ष असल्याने भाजपाचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे खोट बोलले. घरोघर स्मार्ट मिटर लागणार नाही असे तत्कालीन उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देऊन पत्रकारांना सांगितले. वर्तमान पत्रांनी घरोघर स्मार्ट वीज मीटर लागणार नाही अशी पहिल्या पानावर मोठे मथळे देऊन बातमी लावली. त्यावेळी भाकप औरंगाबादने पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे खोट बोलत असल्याचे सांगितले. स्मार्ट मीटर लागणार नसतील तर स्मार्ट मीटर लावण्यासाठी अंबानी अदानी आणि नागार्जून कंस्ट्रक्शन कंपनीला दिलेले कंत्राट रद्द केल्याचा आदेश दाखवा असे आवाहनही केले. त्याचबरोबर औरंगाबाद महावितरण महाव्यवस्थापकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची आठवण करून दिली होती. त्या त्यांनी 48000 स्मार्ट मीटर आले आहेत आणि आम्ही ते लावणार आहोत हे सांगितले. निवडणूक झाल्यावर पुन्हा प्रचंड प्रमाणात वीज दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करून सकाळी , दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळा दर म्हणजे टाइम ऑफ द डे दर प्रणाली हुकुमशाही पद्धतीने मंजूर केली. ज्यांच्या कडे सोलार पॅनल आहे त्यांची वीज 4 .50 रू प्रती यूनिट ने विकत घेऊन 17.50 रु. प्रति यूनिट ने महावितरण कडून विकत घ्यावी लागेल. ज्यांच्या कडे सोलार पॅनल नाही त्यांना प्रति यूनिट 20 रु. पेक्षा जास्त ने वीज विकत घ्यावी लागेल. स्मार्ट मिटर सरकारी कार्यालयात लावल्या नंतर आता सर्वसामान्यांना माहीती न देता गुपचूप खंब्यावरील जूने मिटर काढून स्मार्ट मीटर लावण्याचा प्रकार कैलास नगर व आजू बाजूच्या परिसरात उघडकीस आला. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून त्याठीकाणी ॲड . अभय टाकसाळ यांच्या उपस्थितीत राम मंदीर आणि दादा कॉलनीत बैठक झाली. या बैठकीत गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या आम्हाला आमचे जूने मीटर परत द्या आणि आणि या पुढे गुपचूप स्मार्ट मीटर लावू नये या मागणी साठी 6 मे 2025 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिलकॉर्नर येथील महावितरण महाव्यवस्थापकाच्या कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनात स्मार्ट मिटरला विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी सावध व्हावे स्मार्ट मीटर लावू देऊ नका असे आवाहन ही करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत भाकप राज्य कार्यकारिणी सदस्य व शहर सेक्रेटरी ॲड . अभय टाकसाळ , कॉ विकास गायकवाड , कॉ रफीक बक्श , कॉ अनिता हिवराळे , कॉ मधूकर गायकवाड ,
यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?






