अचानक वातावरणात बदल, अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांना झोडपले, हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला...

 0
अचानक वातावरणात बदल, अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांना झोडपले, हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला...

अचानक वातावरणात बदल, अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, बर्फ पडला! थंड हवा, तुफान पाऊस आणि...

मुंबई, दि.27(डि-24 न्यूज)-

राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल झाल्याने काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने उभ्या पिकांवर परिणाम होत आहे. हरबरा, गहु, पालेभाज्या फळे यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना गारपीठीचा तडाखा बसला आहे. जळगाव, धुळे, पुणे, नाशिक सह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस पडला. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे थंड हवा सुटली. महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता. अशातच हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. 

हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओलसर वारे सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडला आहे. आज सकाळी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, रायगड परिसरात अचानक झालेल्या रिमझिम पावसाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

हवामान विभागाने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी पिवळ्या पावसाचा इशारा जारी केला आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी या भागात हलक्या ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. IMD नुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि विखुरलेल्या गडगडाटासह पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथे दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात नरडाणा परिसरामध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. पाऊसासोबत गारपीट ही झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. अवकाळी पावसामुळे गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. सुसाट वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

जळगाव मध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. जळगावसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. वारा तसेच विजांच्या कडकडाटासह अचानकच्या पावसामुळे चाकरमान्यांची तसेच नागरिकांची धांदल उडाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असल्याने पावसात उमेदवारांना प्रचार करावा लागेल अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे.

गेल्या काही दिवसापासून निफाड सह येवला तालुक्यात परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आठवडी बाजारा करता आलेल्या नागरिकांचे एकच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात शेती पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. पेणच्या जोहे हमरापूर भागात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्ट्या तसेच कारखान्यांचे नुकसान झाले. पुण्यातही पाऊस पडला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow