आदीवासी ढोल सिबलीच्या निनानाद विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप...!

 0
आदीवासी ढोल सिबलीच्या निनानाद विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप...!

आदिवासी ढोल सिबलीच्या निनादात विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप....  

अठ्ठावीस ठरावास मंजुरी 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास खिरापतीचे अनुदान बंद करा,मरू घातलेल्या मराठी शाळांना अनुदान द्या

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)

विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप प्रख्यात इतिहास अभ्यासक इंजि. चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पूर्व संमेलनाध्यक्ष कवयित्री प्रा प्रतिभा अहिरे, सुप्रसिद्ध अभिनेते योगेश शिरसाठ ,स्वागताध्यक्ष सतीश चकोर, मुख्य निमंत्रक धनंजय बोर्डे ,विद्रोहीचे राज्य संघटक किशोर ढमाले, आर. टी .गावित आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी विद्रोही संस्कृतिक चळवळ राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी होत्या. समारोप सत्रात 2001 मध्ये तिसऱ्या विद्रोही साहित्य संमेलन संयोजनात नेतृत्व करणाऱ्या कॉ. भीमराव बनसोड, साथी सुभाष लोमटे व विचारवंत भीमराव सरवदे डॉ .भालचंद्र कांगो या मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करून मरू घातलेल्या मराठी शाळांना अनुदान देऊन त्यांना जिवनदान द्यावे, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात यावे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध, सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांनी मंत्रीपदापासून दूर राहावे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवून लाल महालाचा समावेश करावा,जयपूरच्या उच्च न्यायालयासमोरील मनुचा पुतळा हटवण्यात यावा, फातिमा शेख व मलिक अंबर यांचे स्मारक उभारावे, मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, जात निहाय जनगणना, शेतीमालाचा रास्त भाव, ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न,पाली भाषेचा प्रसार, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल डांगोरा पेटणाऱ्या व प्रत्यक्षात 7820 मराठी शाळा बंद करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध, आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्या म्हणणाऱ्यांवर कारवाई, बोधगया ब्राह्मण पुजार्यांच्या हातून काढून घेणे, जल जंगल जमिनीवरील आदिवासींचा अधिकार व गायरानावरील दलित भटक्यांचा अधिकार मान्य करणे, कर्मकांड सोडणाऱ्या भटक्यांना पर्यायी रोजगार देणे यासह अठ्ठावीस ठराव मंजूर करण्यात आले.

समारोपप्रसंगी संमेलनाचे बोधचिन्हकार चित्रकार राजानंद सुरडकर, कलादालनातील नंदकुमार जोगदंड, सुनील नेत्रगावकर, खलील देशमुख, छायाचित्रकार नानू नेवरे, गौतम निकम, शिल्पकार विकास सरवदे, नरेंद्रसिंग साळुंखे,स्वाती साळुंखे, इलियास शेख आदिंचा संविधान विचार मंचावर सत्कार करण्यात आला. फुले शाहू आंबेडकर सभा मंडपातील समारोपा पूर्वी बाल मंच व युवा मंच यातील कलावंतांना पुरस्कार देण्यात आले.

ठराव वाचन अनिलकुमार बस्ते,भारत सिरसाठ,अनंत भवरे, धम्मरक्षित सामुद्रे, डॉ विलास बुवा, डॉ.विनय हतोले, सविता अभ्यंकर आदिंनी केले.

सुत्रसंचलन खालिद अहमद यांनी केले. आभार सुधाकर निसर्ग यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow