ऑक्ट्रम घाटाचा प्रश्न मार्गी लागणार, उद्या दिल्लीत बैठक, डॉ.भागवत कराड यांचा पुढाकार...!

धुळे -सोलापूर नॅशनल हायवे
ऑक्ट्रम घाटात टनेल बाबत दिल्लीत उद्या बैठक....
खा.डॉ.भागवत कराड यांचा पाठपुरावा....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)
जिल्ह्यातील कन्नड येथील ऑक्ट्रम घाटामध्ये चार किलोमीटर बोगदा
बनविण्या संदर्भात दिनांक 8 एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी 5:30 वाजता नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राष्ट्रीय राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रेल्वे आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. माजी अर्थराज्यमंत्री खासदार डॉ.भागवत कराड यांनी ऑक्ट्रम घाटात बोगदा बनवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून ,त्यांनी रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय यांची बैठक घेण्याची मागणी केली आहे.
भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी होणाऱ्या या
बैठकीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ,केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अलोक दीपंकर, रीजनल ऑफिसर, मनोज कुमार ,बाळासाहेब ठेंग यासह शहरातील उद्योजक या बैठकीस उपस्थित राहणार आहे.
ऑक्ट्रम घाटातील बोगदा हा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर हे देशातील आघाडीचे उद्योग केंद्र यासह अजिंठा येथील प्रसिद्ध लेणी असल्याने पर्यटकांना देखील फायदा होईल त्यामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय राजमार्ग 241 धुळे सोलापूर कन्नड पर्यंत काम पूर्ण झालेले असून , कन्नड शहरालगत असलेल्या ऑक्ट्रम घाटामध्ये तब्बल 4 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहेत. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रु.खर्च येणार आहे.
रेल्वे विभागाने बीड, छत्रपती संभाजीनगर ,कन्नड आणि चाळीसगाव या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय राजमार्ग यासाठी एकच टनेल निर्माण करण्यात यावा.
याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला खासदार डॉ.भागवत कराड यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






