खूलताबादचे नामांतर रत्नपूर करणार - आमदार संजय केनेकर

खूलताबादचे नामांतर रत्नपूर करणार - आमदार संजय सिरसाट
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), औरंगजेबाचे कबरीचा विवाद सुरू असताना आता खुलताबादचे नामांतर रत्नपूर करणार असल्याचे भाजपचे आमदार संजय केनेकर यांचे विधान आले आहे. त्यांनी सांगितले खुलताबादचे नामांतर व तेथे औरंगजेब यांची कबर न हटवता भव्य छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारुन इतिहास माहीत असायला हवे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री संजय सिरसाट यांनीही सांगितले की खुलताबादचे नामांतर रत्नपूर करण्याची जुनी मागणी आहे. अगोदरपासूनच शिवसैनिक रत्नपूर संबोधतात शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करणार आहे.दौलताबादचे देवगिरी हे नाव करण्याचा निर्णय घेतला जाईल. 2014 पासून हे सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील 18 शहरांचे नावे बदलली. त्यामध्ये औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करण्यात आले आहे. औरंगजेब यांच्या कबरीच्या वादानंतर खुलताबादचे नामांतर रत्नपूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर एमआयएम नेते सय्यद इम्तियाज जलील सत्ताधारी पक्षावर भडकले त्यांनी सांगितले या सरकारला शहरांचे नामांतराचेच काम उरले आहेत. रस्ते, रेल्वेस्थानक यांचेही नामांतर करुन टाका. जनहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रधान्य दिले जात नाही ज्वलंत मुद्दे बाजूला सारून असल्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे या सरकारचे लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली.
What's Your Reaction?






