बारावीत पुन्हा मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, औरंगाबाद विभाग 92.24 टक्के निकाल

बारावीत पुन्हा मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, औरंगाबाद विभाग 92.24 टक्के निकाल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक निकालाची प्रतिक्षा करत होते. यंदा राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, पुन्हा एकदा कोकण विभागाने सर्वाधिक यश मिळवत बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका लागला आहे. तर छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) 92.24 टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर 93.64, मुंबई 92.93, पुणे 91.32, अमरावती 91.43, नाशिक 91.31, लातूर सर्वात कमी 89.46, नागपूर 90.52 टक्के निकाल लागला आहे.
दुसरीकडे, लातूर विभागात सर्वात कमी 89.46 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षांप्रमाणे यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 94.58 टक्के असून, मुलांचा निकाल 89.51 टक्के आहे.
टक्केवारी / माहिती
राज्याचा एकूण निकाल
91.88%
सर्वोच्च निकाल विभाग
कोकण - 96.74%
कमी निकाल विभाग
लातूर – 89.46% -
मुलींचा निकाल
94.58%
मुलांचा निकाल
89.51%
What's Your Reaction?






