सामाजिक सलोख्यासाठी गांधी पुतळ्यासमोर केले मौन सत्यागृह...

 0
सामाजिक सलोख्यासाठी गांधी पुतळ्यासमोर केले मौन सत्यागृह...

सामाजिक सलोख्यासाठी गांधी पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह...

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)

निष्पाप पर्यटकांची निघृण हत्या केल्या नंतर, भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे 9 तळ कांही मिनिटात उद्ध्वस्त केले तेंव्हा संपूर्ण देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा राहिला , पण कांही असामाजिक तत्व जातीयतेच्या नावाने समाजात विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, कोणत्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा अबाधित च राहिला पाहिजे म्हणून आज गांधी पुतळ्यासमोर, सामाजिक कार्यकर्त्यांनी मौन सत्याग्रह केला.

कश्मिर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांचे हल्ल्यात सर्वच धर्माचे निष्पाप बळी गेले, त्याचा आपल्या देशासह जगाने तीव्र निषेध केला.

दोन्ही देशांचे सीमेलगत तळ ठोकून बसलेल्या दहशतवाद्यांचे विरोधात पाकिस्तान कोणतीही कारवाई करीत नाही हे लक्षात आल्यावर, भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे 9 तळ उध्वस्त केल्यावर, संपूर्ण देश सैनिकांबरोबर उभा ठाकला.

अतिरेकी वा दहशतवाद्यांना कोणताही जात - धर्म नसतो हे माहीत असूनही, सत्तेमधील कांही उच्च पदस्थ ( मंत्री, आमदार - खासदार..) मंडळी जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याने, 17 मे पासून राष्ट्रीय स्तरावर सामाजिक सलोखा अभियानचे माध्यमातून जनजागरण सुरू करण्याचा निर्णय, देशातील लोकशाही, समता, बंधुता, शांती, धर्मनिरपेक्षता , अहिंसा इ. संविधानिक मूल्यावर विश्वास असणाऱ्या संघटना - कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

त्याचाच एक भाग म्हणजे आज शहरात केलेला मौन सत्याग्रह होय.

या मौन सत्याग्रहात प्रा. एच. एम. देसरडा, साथी सुभाष लोमटे, ऍड. सुभाष सावंगीकर, प्रा. श्रीराम जाधव, ज्ञानप्रकाश मोदानी, मा.रमाकांत पाठक,.साथी भाऊसाहेब पठाडे, साथी देविदास किर्तीशाही, सिरसे, आयन खान इ. चा प्रमुख सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow