अतिक्रमण कारवाई दरम्यान जेसीबी जाळला, 25 ते 30 लाखांचे नुकसान, गुन्हा दाखल होणार
अतिक्रमण कारवाई दरम्यान जेसीबी जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने राज नगर मुकुंद नगर येथे अतिक्रमण कारवाई करण्यात येत होती. त्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी मनपा पथकावर दगडफेक केली. काही नागरिकां द्वारे पथक कर्मचारी यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये मनपाचे कोणीही अधिकारी कर्मचारी ,पोलीस कर्मचारी जखमी झालेले नाही.
यावेळी काही नागरिकांनी महानगरपालिकेचा जेसीबी पेटवून दिला. यामुळे महानगरपालिकेची किमान 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार मनपाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप पावेतो सुरू आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने डि-24 न्यूज देण्यात आली आहे.
What's Your Reaction?