जिल्हा क्रीकेट संघटनेची धुरा मंत्री अतुल सावे, 18 वर्षांनंतर झाली निवडणूक...!

 0
जिल्हा क्रीकेट संघटनेची धुरा मंत्री अतुल सावे, 18 वर्षांनंतर झाली निवडणूक...!

जिल्हा क्रीकेट संघटनेची धुरा मंत्री अतुल सावे यांच्याकडे, 18 वर्षांनंतर झाली निवडणूक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि 11(डि-24 न्यूज) :- तब्बल 18 वर्षांनंतर पार पडलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत राज्याचे मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे संघटनेच्या नेतृत्वाबाबत असलेली दीर्घकालीन अनिश्चितता अखेर दूर झाली असून जिल्ह्यातील क्रिकेट क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

धर्मादाय उपआयुक्तांच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर इतर कोणताही उमेदवार शर्यतीत राहिला नसल्याने अतुल सावे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

संघटनेची निवडणूक जवळपास दोन दशकांपासून रखडलेली होती. त्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेटपटू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना आणि विविध क्लबांचे प्रतिनिधी या प्रक्रियेकडे उत्सुकतेने पाहत होते. सिडको स्टेडियम परिसरातही निवडणुकीबाबत मोठी चर्चा रंगली होती.

अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कामकाजात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील क्रिकेटच्या पायाभूत सुविधांचा विकास, युवा खेळाडूंना अधिक संधी, स्पर्धांचे प्रभावी आयोजन तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी नव्या नेतृत्वाकडून ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा क्रिकेट वर्तुळातून व्यक्त होत आहे.

18 वर्षांनंतर संघटनेला नवे नेतृत्व मिळाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील क्रिकेट विकासाला नवी गती मिळेल आणि ग्रामीण-शहरी भागातील होतकरू खेळाडूंना पुढे येण्यासाठी अधिक व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow