नामांतरावर आज उच्च न्यायालयात काय झाले, उद्या पुन्हा सुनावणी, निकालाची प्रतिक्षा

 0
नामांतरावर आज उच्च न्यायालयात काय झाले, उद्या पुन्हा सुनावणी, निकालाची प्रतिक्षा

नामांतरावर सुनावणी संपन्न, उद्याही होणार सुनावणी

मुंबई, दि.6(प्रतिनिधी) औरंगाबाद शहराच्या नामांतरावरावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्याही सुनावणी होणार आहे यानंतरच निकाल अपेक्षित असल्याची माहिती माध्यमांना याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव शासनाने करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन्ही प्रकरणांत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गाव व त्याच प्रमाणे उस्मानाबाद जिल्हा, तालुका, गाव नामांतरावर सुनावणी झाली पण निकाल राखून ठेवला आहे. 

आज झालेल्या सुनावणीत जेष्ठ वकील एड युसुफ मुशाला यांनी 40 मिनटे युक्तिवाद केला. हिशाम उस्मानी यांच्या वतीने बॉम्बे उच्च न्यायालयात जेष्ठ वकील अनिल अंतुरकर व अँड एस एस काझी हे उद्या युक्तिवाद करतील. यावेळी याचिकाकर्ते मुश्ताक अहमद, याचिकाकर्ते हिशाम उस्मानी यांचे वकील एड एस.एस.काझी, त्यांचे असि.एड शेख मोईन, उस्मानाबाद नामांतर विरुद्ध याचिकाकर्ता व त्यांचे वकील एड सतीश तळेकर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow