मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जावेद कुरैशी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जावेद कुरैशी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) मायनाॅरीटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या वतीने औरंगाबाद येथून 13 ऑक्टोबर पासून मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी जावेद कुरैशी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पर्यंत पायी लाॅन्ग मार्च काढण्यात आला. हा लाॅन्ग मार्च 26 ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय पोहोचला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करत विस्ताराने मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीवर चर्चा करण्यात आली.
औरंगाबाद येथून विविध जिल्हा, तालुका व गावात मुस्लिम आरक्षणाबाबत जनजागृती करत हा लाॅन्ग मार्च मुंबईत पोहोचला. प्रत्येक ठिकाणी छोटेखानी सभा घेत जावेद कुरैशी यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 40 पानांचे निवेदनात मुस्लिम आरक्षणाचे महत्व विषद करण्यात आले आहे. 6 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
यावेळी आमदार विक्रम काळे, शेख मसूद, साजिद पटेल, अब्दुल हाफिज अली, शेख अमीर, मतीन पटेल, नजीब मुल्ला आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?