अमन साठी केली हजारो मुस्लिम बांधवांनी दुवा...इबादतकडे लक्ष केंद्रित करा

अमन साठी केली हजारो मुस्लिम बांधवांनी दुवा...इबादतकडे लक्ष केंद्रित करा
दुस-या दिवशी सामुहिक निकाह व दुवा
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) हर्सुल येथे दोन दिवसीय उमुमी इज्तेमा आज रात्री सामुहिक दुवा करुन समारोप करण्यात आला. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. बाद नमाज असर सामुहिक विवाह संपन्न झाला. जमातसाठी तश्कील करण्यात आली. मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती समद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जो अल्लाहचा मार्ग इबादत व आचरण करावे अशी शिकवण इस्लाम धर्मात दिली आहे त्यांचे पालन करणे सर्व मानवजातीला अनिवार्य आहे. कोणाचे मन दुखावेल अशी वागणूक नसावी. अल्लाहची इबादत पाच वेळेस नमाज अदा करने आपले आद्य कर्तव्य आहे. आई वडीलांची व ज्येष्ठांची सेवा करावी. चुकीची सवयींपासून निर्व्यसनी जीवन जगावे. दिनची सेवा जमातीमध्ये गेले तरच परिपक्वता येईल. तो अल्लाहचा रास्ता आहे जो त्या रस्त्यावर राहुन दिनची सेवा करेल तो दिन व दुनियात यशस्वी होईल. आखिरतच्या आयुष्याकडे अधिक लक्ष द्यावे असे अनमोल मार्गदर्शन केले.
सामूहिक निकाल मौलाना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. दुवा मौलाना जावेद पुनावाला यांनी केली. दुवा करताना डोळ्यात अश्रू अनावर झाले. जगात व देशात बंधूभाव, भाईचारा व अमन शांतीसाठी मुस्लिम बांधवांनी यावेळी विशेष दुवा केली.
इज्तेमागाहमध्ये वाहनांसाठी स्वतंत्र पार्कींग व्यवस्था, पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो स्वयंसेवक सेवेत उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी दुवासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुवासाठी येताना व जाताना शिस्तीचे दर्शन घडले. 83 मस्जिद अंतर्गत या दोन दिवसीय उमुमी इज्तेमाचे आज समारोप झाले. यानंतर शहरात विविध ठिकाणी उमुमी इज्तेमा होणार आहे. 17 ते 27 नोव्हेंबर पर्यंत शहर आणि जिल्ह्यात तब्लिगी उमुमी इज्तेमा होणार आहे.
What's Your Reaction?






