ऑक्ट्रम घाटात रेल्वे, भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून होणार तीन बोगदे - डॉ.भागवत कराड

ऑक्ट्रम घाटात रेल्वे, भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून होणार तीन बोगदे.....
दिल्लीत झालेल्या बैठकीत 50 टक्के कोस्ट शेरिंग दोन्ही मंत्रालयाची सहमती....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.8(डि-24 न्यूज)
जिल्ह्यातील कन्नड येथील ऑक्ट्रम घाटामध्ये तब्बल 15 किलोमीटर लांबीचे तीन बोगदे बनविण्यात येणार असून, त्या बोगद्यासाठी रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून 50 टक्के भागीदारी तत्त्वावरती बोगदे बनविण्यात येणार आहे. बोगद्याचा डीपीआर बनवण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांनी यंत्रणांना आदेशित केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ऑक्ट्रम घाटात
बोगद्याचा प्रश्न रखडल्याने, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून बोगदे काम करण्यात येणार असल्याने उत्तर आणि दक्षिण भारतातील दळणवळण, पर्यटन, उद्योग क्षेत्राला यामुळे मोठा फायदा होणार आहे.
असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय राजमार्ग 241 सोलापूर धुळे महामार्ग औक्ट्रम घाटातील बोगद्या संदर्भात नवी दिल्लीमध्ये आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवास स्थानी बैठक झाली या बैठकीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी अर्थ राज्य मंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड, शहरातील प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे ,राम भोगले यांच्यासह मंत्रालयातील दोन्ही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ऑक्ट्रम घाटामध्ये 15 किलो मीटर लांबीचे चार बोगदे निर्माण करण्यात येणार असून, एका बोगद्यातून रेल्वे आणि दुसऱ्या बोगद्यातून राष्ट्रीय राजमार्ग धुळे सोलापूरची वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तसेच इतर दोन बोगदे हे सुरक्षिते साठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
सध्या कन्नड लगत ऑक्ट्रम घाटामध्ये बोगदा नसल्याने वाहनांना तब्बल 110 किलोमीटर अंतरावरून फेरा मारून रोज 22 हजार वाहनांची वाहतूक होत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये होत असलेली औद्योगिक गुंतवणूक लक्षात घेता, किर्लोस्कर यथार्थ यासह नामांकित कंपन्याच्या माध्यमातून विकास होईल त्यामुळे भविष्यात या महामार्गावरून तब्बल चाळीस हजार वाहनांची वाहतूक होईल असे उद्योजक राम भोगले यांनी या बैठकीत सांगितले. बोगदा झाल्याने
परिणामी नागरिकांना वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च कमी होईल
ही बाब लक्षात घेऊन ऑक्ट्रम बोगदा निर्मितीसाठी रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय दोन्हीच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
ऑक्ट्रम घाटातील बोगदा हा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर हे देशातील आघाडीचे उद्योग केंद्र यासह अजिंठा येथील प्रसिद्ध लेणी असल्याने पर्यटकांना देखील याच मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना
मिळणार आहे.
What's Your Reaction?






