कटकट गेट येथे शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नका, डिसिपि नितीन बगाटे यांचे शांततेचे आवाहन

कटकट गेट येथे शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नका...
काही काळ तणाव झाल्याने बाजारपेठ बंद झाली होती.
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) कटकट गेट येथील एका हाॅटेल मध्ये जोडपे जेवन पार्सल घेण्यासाठी आले असताना येथील काही युवकांना शंका आली हे हिंदू मुस्लिम प्रेम प्रकरण तर नाही ना असे वाटल्याने या हाॅटेलात व परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असल्याने हाॅटेल मालकाने पोलिसांना बोलावले. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. जमाव मोठ्या प्रमाणात जमत असल्याने पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे फौजफाट्यासह तेथे पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणून मुलगा व मुलीला सुरक्षित काढून सुखरूप त्यांच्या घरी पोलिस बंदोबस्तात पाठवले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. हजारोंच्या संख्येने जमाव येथे जमला असताना डिसिपि नितीन बगाटे यांनी जमावला घरी जाण्याचे माईकवरुन विनंती केली. त्यांनी शांततेचे आवाहन केले व येथे काही झाले नाही अफवांवर शहरातील नागरिकांनी विश्वास ठेऊ नका. सोशल मीडियावर काही तणाव निर्माण करणारे पोस्ट व्हायरल करु नये असे आवाहन केले.
याप्रसंगी खासदार इम्तियाज जलील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. येथील युवकांना घरी जाण्याचे आवाहन केले. यावेळी एमआयएमचे सलिम सहारा, अब्दुल अजीम, हाजी इसाक खान व कदीर मौलाना यांनीही येथे पोलिस प्रशासनाला सहकार्य केले. आता कटकट गेट येथे शांतता आहे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
.
What's Your Reaction?






