काँग्रेसने दिले पोलिस आयुक्तांना निवेदन...!

 0
काँग्रेसने दिले पोलिस आयुक्तांना निवेदन...!

काँग्रेसने दिले पोलिस आयुक्तांना निवेदन...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.17(डि-24 न्यूज)

रामगिरी महाराजांनी केलेले वक्तव्य मुस्लिम समाजातील बांधवांना दुखावणारे वक्तव्य आहे.

 भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने आपण ज्या समाजात आहोत ज्या धर्माच्या नेतृत्वात आपण लहानचे मोठे होतो किंवा त्या संबंधित धर्म व जातीस बद्दल समाजामध्ये प्रबोधन करणं ही सकारात्मक विचार आहे. मात्र कुठेतरी आपल्या दूषित वक्तव्यातून इतर धर्म व त्या धर्मातील बांधवांच्या भावना दुखवणे ही एक नकारात्मक विचारसरणी आहे.

 दूषित वक्तव्य करणारी व्यक्ती महत्त्व कुठल्याही समाजाची व धर्माची असो त्याने वतीने केलेले वक्तव्य हे इतर समाजाला दुखावणारे नसावी. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि देशातील व राज्यातील शांतता भंग होईल असं वक्तव्य करणारी व्यक्ती देशद्रोही का म्हणता येणार नाही का...?

      म्हणून आज काँग्रेस कमिटीच्या वतीने रामगिरी महाराज यांनी केलेल्या दूषित वक्तव्यामुळे पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आली. हे वक्तव्य करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

    यावेळी माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, सय्यद आक्रम, प्रदेश सरचिटणीस, जफर खान, काँग्रेस प्रवक्ता डॉ. पवन डोंगरे , शहरजिल्हा महिला अध्यक्ष दिपाली मिसाळ, डॉ. सरताज पठाण, अहमद चाऊस, शेख अथर,

अमीर अब्दुल सलीम, कृष्णा भंडारे, प्रशांत शिंदे नगमा सिद्दिकी, रुबीना सय्यद, सलमान नाहीद, इरफान पठाण, परविन देशमुख, इरफान पठाण युवा काँग्रेस महाराष्ट्र, सरताज पठाण, लियाकत पठाण, अमीर रफिक, इफ्तार इंजिनियर, मोसिन इंजिनियर, सुनील डोणगावकर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow