खंडाळा घटना...संजय केनेकर यांच्यावर एसडिपिआईचे गंभीर आरोप...

 0
खंडाळा घटना...संजय केनेकर यांच्यावर एसडिपिआईचे गंभीर आरोप...

मोईन शाह यांची हत्या ही एक सुनियोजित कट आहे... 

वैजापूर, खंडाळा येथील मोईन शाह हत्या प्रकरणात अटक आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी SDPI

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज),

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात मोईन शाह यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करते. ही घटना कथितरित्या कट्टरपंथी गो रक्षक आणि बजरंग दलाशी संबंधित व्यक्तींनी घडवून आणली, ज्यात आणखी एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली. आम्ही या प्रकरणातील अटकेच्या वृत्ताचे स्वागत करतो, परंतु सर्व दोषींना कठोर शिक्षा मिळणे आणि या गुन्ह्यामागील खरे सूत्रधार उघडकीस येणे आवश्यक आहे. अशी माहिती सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश महासचिव सय्यद कलिम यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितले या हत्येत सहभागी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, आणि त्यांचे बजरंग दल आणि गो रक्षा दल यांसारख्या कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचे नमूद आहे. याशिवाय, विधान परिषद सदस्य (MLC) संजय केनेकर खोट्या कथा रचून हत्या-यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक न्यायासाठी गंभीर आव्हान आहे.  

एसडीपीआयच्या मागण्या:

उच्चस्तरीय चौकशी: या हत्येची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी, जी आरोपींचे कट्टरपंथी संघटनांशी संबंध आणि या गुन्ह्यामागील कट कारस्थानाची पूर्ण तपासणी करेल.  

सर्व दोषींवर कारवाई: अटक झालेल्या आरोपींसह या हत्येत सहभागी सर्व व्यक्तींवर, विशेषतः बजरंग दल आणि गो रक्षा दल यांसारख्या संघटनांच्या नेत्यांवर, कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.  

संजय केनेकर यांच्या भूमिकेची चौकशी: भाजपा MLC संजय केनेकर यांनी हत्या करणा-या कथितरित्या वाचवण्याच्या प्रयत्नांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई व्हावी.  

समुदायाची सुरक्षा: अल्पसंख्याक समुदायांसह सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.  

आर्थिक मदत: मोईन शाह यांचे कुटुंब गरीब आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे, त्यामुळे प्रशासनाने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.  

एसडीपीआय पीडित कुटुंबियांप्रती आपली संवेदना आणि एकजुटी व्यक्त करते. आम्ही प्रशासनाला मागणी करतो की या प्रकरणात त्वरित, निष्पक्ष आणि पारदर्शी कारवाई करावी, जेणेकरून न्याय सुनिश्चित होईल. तसेच, सामुदायिक शांतता राखण्यासाठी सर्व पक्षांनी संयम बाळगावा, अशी विनंती आहे.  

प्रमुख उपस्थिती:

महाराष्ट्र प्रदेश महासचिव सय्यद कलीम, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष समीर शाह, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. हाफीज इमरान, जिल्हा महासचिव मोहसिन खान, नदीम शेख, जिल्हा सचिव साकी अहमद, कोषाध्यक्ष समीउल्लाह काज़ी फरहान शेख, जिल्हा सदस्य अशरफ पठान, आरेफर शाह आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow