गणिमीकाव्याने केंद्रीय सहकार मंत्र्यांचा घेराव करणार- खा.इम्तियाज जलिल

गणिमी काव्याने करणार केंद्रीय सहकार मंत्र्यांचा घेराव- खा.इम्तियाज जलिल
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आतापर्यंत मिळालेले नाही. ठेवीदारांचे पैसे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी घेतला आहे. आदर्शचा घोटाळा दोनशे कोटींपर्यंत आहे. सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा या मागणीसाठी आदर्श पतसंस्थेतील ठेविदार देशाचे गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांचा गणिमीकाव्याने घेराव करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलिल यांनी इशारा दिला आहे. 16 सप्टेंबर रोजी अमित शहा हे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त शहरात कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 17 सप्टेंबर रोजीही मंत्रीमंडळ बैठकीत घेराव करण्याचा इशारा दिला आहे.
17 आणि 18 सप्टेंबर रोजी शहरात मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व मंत्री शहरात 15 सप्टेंबर रोजी दाखल होणार आहे. मुख्यमंत्री व दोनीही उपमुख्यमंत्री यांचे गणिमीकाव्याने घेराव करणार असल्याचा इशारा इम्तियाज जलिल यांनी दिला आहे. त्यांची मागणी आहे ठेवीदारांचे पेसे परत करण्याची हमी सरकारने घ्यावी. विशेष समिती नियुक्त करुन या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा. खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखाली गणिमीकाव्याने घेराव करणार असल्याचे पोस्ट सोशलमिडीयावर व्हायरल झाली आहे.
What's Your Reaction?






