चिकलठाण्यात शाॅक लागून शेतकरी काका पुतण्याचा मृत्यू, चक्का जाम प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे...

चिकलठाण्यात शाॅक लागून शेतकरी काका पुतण्याचा मृत्यू, चक्का जाम प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) सायंकाळी 5 ते 6 वाजे दरम्यान चिकलठाणा रेल्वे पटरीनजीक शेतात मशागत करताना शेतात पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने शेतकरी काका पुतण्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याने चिकलठाणा गावात शोककळा पसरली.
या घटनेत काका कचरु जनार्दन दहिहंडे, वय 50, राहणार चिकलठाणा, पुतण्या किरण जगन्नाथ दहिहंडे, वय 30, रा.चिकलठाणा, छत्रपती संभाजिनगर
या घटनेनंतर महावितरणवर गावातील नागरीक संतप्त झाले.
गावक-यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यातसमोर हनुमान चौकात संबंधित दोषी महावितरणच्या अधिका-यांवर मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक नूकसानभरपाई द्यावी नसता मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गांवकरी व नातेवाईकांनी घेतला. चक्का जाम आंदोलनामुळे जालना रोडवरील वाहतूक दोन तास खोळंबली होती.
येथील गावक-यांनी आरोप केला महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दोन शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. दोषी अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तीन ते चार दिवसांपासून विजेचा खांब जमीनीवर पडला आहे. त्यांचे तारा शेतात जमीनीवर पडल्या होत्या. तीन दिवस विजेचा प्रवाह बंद होता, दुरुस्तीसाठी अर्ज दिला फोन केला तरीही केली नाही दुरुस्ती न करता अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला आणि हि घटना घडली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिस उपायुक्त स्वामी, क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, चिकलठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्याणकर यांनी आंदोलकांची समजूत काढली. अपर तहसिलदार राजेंद्र चौधरी यांनी महावितरणच्या अधिका-यांवर कार्यवाही करणार व कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेतले. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यवाही झाली पाहीजे अशी मागणी नातेवाईकांनी केली.
What's Your Reaction?






