पहील्याच पावसात शिवाजीनगर भुयारी मार्गाची पोलखोल तर काही वस्त्यांमध्ये पाणीच पाणी...!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) आज दुपारी अवकाळी पावसाने विजेच्या कडकडासह जोरदार बॅटिंग केली. यामुळे शहरातील नागरीकांमध्ये दानादान उडाली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यावर दोन ते तीन फुट पाणी वाहत होते तर काही घरांमध्ये पाणी घुसले. परंतु पहिल्याच पावसात शिवाजिनगर भुयारी मार्गाची पोलखोल केली. घाईघाईत या भुयारी मार्गाचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. भुयारी मार्गात तीन ते चार फुट पाणी साचल्याने काही वाहने अडकली बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत वाहनधारकांना करावी लागली. पादचा-यांना पाईपवर चढून रस्ता पार करावा लागला यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. पाणी साचल्याने वाहतूकीचा खोळंबा उडाला. काही लोक आपल्या मोबाईलवर फोटो व्हाडिओ काढत होते. रेल्वे विभागाने बनवलेल्या या भुयारी मार्गात दोन दिवस अगोदर हायवा फसला होता आणि आज झालेल्या पावसामुळे दानादान उडाली.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स हॅन्डलवर व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी पक्षावर टिका केली आहे. त्यांनी टिका करताना लिहिले "हा आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घाईघाईत उद्घाटन केलेला शिवाजिनगरचा अंडर पास..! याला स्टाॅर्म ड्रेनचा पत्ता नाही. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने या अंडर पास मधून कोण गाडी घालणार...? तातडीने पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टाॅर्म करता येत नसतील तर समुद्रासारखी रोरो सेवा सुरु करुन लोकांना या तिराचे त्या तिराला जाण्याची सोय आता रेल्वे विभाग आणि पालकमंत्री महोदयांनी करावी".
What's Your Reaction?






