पाकिस्तानच्या आतंकी ठिकाणांवर भारताचे ऑपरेशन सिंदूर...जय हिंद जय भारत...!

पाकिस्तानच्या आतंकी ठिकाणांवर भारताचे ऑपरेशन सिंदूर...जय हिंद जय भारत...!
मुजफ्फराबाद, बहावलपुर, कोटली वर भारतीय सेनेचा बाॅम्ब हल्ला...
नवी दिल्ली, दि.7(डि-24 न्यूज) पाकिस्तानच्या 9 आतंकी ठिकाणांवर भारताने आता दिड वाजेच्या सुमारास भारतीय पराक्रमी सेनेने ऑपरेशन सिंदूर राबवून एअर स्ट्राईक केले आहे. भारताचे स्वरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी जय हिंद असे ट्विट करत याला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सेनाप्रमुख यांची बैठक घेऊन पूर्ण अधिकार दिले होते. याप्रमाणे आज पहलगाम हल्ल्याचा देशभरात संतापाची लाट असताना पंतप्रधानांनी देशवासीयांना विश्वास दिला होता. त्यानंतर हि कार्यवाही करण्यात आली आहे. आतंकवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल त्याप्रमाणे जमात उद दावा आतंकी ठिकाणांवर भारताने आता हल्ला करत प्रत्युत्तर दिले आहे याचे देशभर कौतुक होत आहे. भारताची अगोदरपासूनच आतंकी विरोधात लढाई सुरू आहे. भारताकडे वाकडी नजर शत्रुने केली तर सोडणार नाही अशा प्रकारे एअर स्ट्राईक करुन उत्तर दिले जाईल असे भारतीय सेनेने दाखवून दिले आहे. यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे. सकाळपर्यंत
कळू शकेल या हल्ल्यात कीती आतंकी मारले गेले किती नुकसान झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहेबाज शरीफ यांनी ट्विटरवर दुजोरा दिला आहे कि पाकिस्तानवर हल्ला झाला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनीही ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर ट्विटरवर जय हिंद म्हटले आहे.
What's Your Reaction?






