पाणी प्रश्नावरून दोन्ही शिवसेनेत रंगला कलगीतुरा, सिरसाटांनी आंदोलनावरुन घेतला समाचार...!

पाणी प्रश्नावरून दोन्ही शिवसेनेत रंगला कलगीतुरा, सिरसाटांनी आंदोलनावरुन घेतला समाचार...!
अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांना संपवायला निघाले, खैरेंना आपल्यासोबत येण्यास खुली ऑफर...पाणी देण्याची वेळ आली तेव्हा आंदोलनाचा इशारा हे हास्यास्पद...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) महाविकास आघाडीची सत्ता असताना पाणी प्रश्न सोडवला नाही ते लांडगे आहेत जे पाण्यावरून राजकारण करण्यासाठी आंदोलन करणार आहे म्हणे. लबाडांनो पाणी देता का हे आंदोलन एका महीनाभर उबाठा सुरू ठेवणार असल्याचा सत्ताधारी पक्षाला इशारा दिला याला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय सिरसाट हे उबाठाच्या नेत्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी यावेळी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जहरी टीका केली म्हणाले असले आंदोलन करुन उरलेल्या उबाठा पक्षावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना संपवण्यासाठी दानवे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी भव्य हंडा मोर्चा काढला होता. सध्या शहरात पाणीबाणी सुरू आहे. दहा बारा दिवसाआड नळाला पाणी मिळत असल्याने नागरीक संतप्त झाले आहे. पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू झाली आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जेव्हा पाणी मुबलक देण्याची वेळ आली तेव्हा उबाठाला आंदोलन आठवले. समांतरच्या टक्केवारीसाठी बारा वर्षे लोटली तेव्हा काय करत होते हे नेते. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा निधी आणला कामाला गती मिळाली पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे आणि विरोधकांना पक्ष वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असा घणाघात त्यांनी केला. ते पुढे म्हणाले त्यांच्या काळचे रस्ते बघा आणि आत्ताचे रस्ते बघा फरक दिसेल हजारो कोटी रुपयांच्या निधी खर्च करण्याचे नियोजन केले आणि त्यांना रस्त्याचे शंभर कोटी खर्च करता आले नाही हा फरक आहे. उबाठात फक्त दानवे आणि खैरे उरले आहेत. पदाधिकाऱ्यांची आमच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन कमिंग सुरू आहे उद्या आणि परवा आणखी पक्षप्रवेश होणार आहे. खैरेंनी विचार करावा त्यांना प्रमाणिक काम करण्याची सवय आहे येथेही त्यांना तोच सन्मान मिळेल. त्यांनी शिवसेना वाढवली यामध्ये काही शंका नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवत आहे. आगामी महापालिका निवडणुका झाले तर यांचा उबाठा पक्ष कोठेच दिसणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांना आता विचारत नाही एकला चलोची परिस्थिती उबाठाची झाली असल्याचा आरोप पालकमंत्री संजय सिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
What's Your Reaction?






