पाण्यासाठी महीला काँग्रेस रस्त्यावर, मनपावर धडकला हंडा मोर्चा...!

 0
पाण्यासाठी महीला काँग्रेस रस्त्यावर, मनपावर धडकला हंडा मोर्चा...!

पाण्यासाठी महीला काँग्रेस रस्त्यावर, मनपावर धडकला हंडा मोर्चा...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.24 न्यूज) सत्ताधारी पक्षाच्या वतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी फक्त आश्वासन दिले जात आहे. शहरातील नागरिकांना नळाला पाणी येण्यासाठी 12 ते 15 दिवस वाट पाहावी लागत आहे तर काही वार्डात दुर्गंधीयुक्त दुषित पाणी येत असल्याने महीला काँग्रेस अक्रामक झाली आहे. आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शहराध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला. महीलांनी हातात हंडा घेऊन घोषणाबाजी केली. मनपा आयुक्तांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. डिसेंबर अखेरपर्यंत पाणी दररोज मिळेल असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले यानंतर मोर्चाची सांगता झाली. यावेळी शहराध्यक्ष युसुफ शेख, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, एड सय्यद अक्रम, डॉ.सरताज पठाण, अनिस पटेल ,महीला जिल्हाध्यक्ष दिक्षा पवार, जयप्रकाश नारववरे, शुभम बनकर, मोईन इनामदार, मोईन शेख हर्सुलकर, कविता शिंदे, सलमा नाहीद, संतोष भिंगारे, परवीन देशमुख, गुलाब पटेल, मुदस्सर अन्सारी आदी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow