विजेच्या स्मार्ट मिटर लावण्यास विज ग्राहकांचा विरोध, महावितरण कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने

गुपचूप स्मार्ट लावणे बंद करा... !
लावलेले मिटर काढून घ्या !
वीज दर कमी करा !
लोडशेडींग बंद करा !
या मागण्यांसाठी भाकपची तीव्र निदर्शने !
छत्रपति संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) कैलास नगर, दादा कॉलनी, भावसिंगपुरा, शंभूनगर व शहरातील इतर भागात गुपचूप व जबरदस्तीने लावलेले विजेचे स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व इतर ठिकाणी लावू नका, वीज दरवाढ कमी करा, लोडशेडींग बंद करा या मागण्यांसाठी भारतीय कम्यूनिस्ट पक्षातर्फे महावितरणच्या ज्युब्ली पार्क येथील सह व्यवस्थापकीय संचालक कार्यालयासमोर मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
याबाबत असे की
महाराष्ट्रातील जनता शांत बसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात विकली जाते , जनता शांत आहे म्हणून जनतेची अशी लुटमार करणे योग्य नाही. तिन-चार वर्षापूर्वी सरकारने नियोजीतपणे सरसकट सर्वांनाच चोर ठरवून विजेचे मिटर घरातून काढून सार्वजनिक पोलवर रस्त्यावर लावून घेतले. गुपचुप स्मार्ट मिटर लावण्यासाठीचे सरकारचे ते भविष्यातील नियोजनच होते , हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. स्मार्ट मिटरला जनतेचा विरोध आहे हे ओळखून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 च्या पूर्वी भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व विद्यमान महसुलमंत्री यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांचा संदर्भ देत घरोघर स्मार्ट मिटर लागणार नाहीत , असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. महाराष्ट्राच्या प्रमुख वर्तमानपत्रात पहील्या पानावर सदर बातम्या छापण्यात आल्या होत्या. परंतू स्मार्ट मिटरचे टेंडर रद्द केले नव्हते व सदर काळात सरकारी कार्यालयात व सरकारी निवासांमध्ये सदर स्मार्ट मिटर लावण्यात आले. सदर सरकारी कार्यालयांचे वीज बिल हे जनतेच्या पैशातूनच भरले जाते. निवडणूका झाल्या , भा.ज.पा. सत्तेत आले आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर , दादा कॉलनीचा काही भाग , भावसिंगपूरा, शंभूनगर व शहराच्या काही भागात गुपचुप स्मार्ट मिटर लावले जात आहेत. स्मार्ट मिटर लावण्यास कैलासनगर , दादा कॉलनी व भावसिंगपूरा व शहरातील इतर भागातील नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. लोकांची परवानगी नसतांना अशाप्रकारे चलाखी करुन , गुपचुप तसेच अनेकांचे फॉल्टी मिटर नसतांना फॉल्टी मिटरच्या नावाखाली जुने मिटर घेवुन जायचे आणि बदमाशीने स्मार्ट मिटर लावायचे तसेच नविन कनेक्शन देत असतांनाही जबरदस्तीने जुन्या पध्दतीचे मिटर नाहीत , घ्यायचे असेल तर हेच घ्यावे लागेल अशी हुकुमशाही , जबरदस्ती करुन स्मार्ट मिटर जनतेला लुटण्यासाठी लावायचे हा प्रकार थांबला पाहीजे. ज्या ठिकाणी स्मार्ट मिटर लावले आहेत ते स्मार्ट मिटर काढुन पूर्वीचे मिटर लागले पाहीजे अन्यथा आपणास जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल. कैलासनगर , दादा कॉलनी , भावसिंगपूरा , शंभूनगर व शहरातील इतर भागात लावलेले स्मार्ट मिटर तातडीने काढून घ्या व पूर्वीचे जुने मिटर तात्काळ लावा , प्रचंड लुटमार करण्यासाठी मंजूर केलेले टीओडी पध्दतीचे वीज दर कायमचे रद्द करा व एप्रिल 2024 च्या दरापेक्षाही अर्ध्यापेक्षा कमी वीज दर करा , मुंबई पुण्याच्या लोकांना 24 तास वीज देता आणि वापर वाढला म्हणून उन्हाळयात मुद्दाम मराठवाडयाच्या लोकांना अघोषीत व बेमुदत लोड शेडींग करुन अतोनात त्रास देता हे बरोबर नाही. त्यामुळे हा भेदभाव लोकांच्या लक्षात आलेला आहे. लोडशेडींगमुळे घरातील वयोवृध्द , लहान मुले , महीला त्रस्त आहेत , व्यापारी व उद्योजक वैतागले आहेत , त्यामुळे लोडशेडींग तातडीने थांबली पाहीजे. मराठवाडयावरील अन्याय सहन केला जाणार नाही. वरील अन्याय तातडीने न थांबल्यास प्रत्येक महीन्याच्या पहील्या बुधवारी प्रचंड निदर्शने आपल्या कार्यालया समोर बेमुदतपणे करण्यात येतील. याची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि आपल्या नाकर्तेपणाची असेल याची नोंद घ्यावी असे मुख्य अभियंता यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य व शहर सेक्रेटरी ॲड अभय टाकसाळ , कॉ जॅक्सन फर्नांडीस, कॉ विकास गायकवाड , कॉ रफीक बक्श , कॉ मधूकर गायकवाड , कॉ अनंता कऱ्हाळे, कॉ जफर फजलू रहमान , सय्यद शौकत , आशा थोरात , कमला अग्रवाल , वच्छला वाघ , उषा राठोड , उमा अग्रवाल , शांताबाई जाधव , राजाभाऊ शिरसाठ , रेखा साळवे , सुनिता चव्हाण , कॉ रुबीना सय्यद , आतिष दांडगे , अभिजीत बनसोडे ,
किशोर हरिश्चद्रे , सुभाष साबळे ,
समंदर खान उर्फ वसीम
शेख शकील शे नवाब , अलीम खान नवाब , शेख एजाज , शेख इसाक, समाधान पारधे, अब्बुल शेख मतीन, शेख रफीक , शेख अफसर ,
यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते .
What's Your Reaction?






