शहरातील पाणीपुरवठा बाबत महानगरपालिका गंभीर नाही - आमदार संजय केनेकर

 0
शहरातील पाणीपुरवठा बाबत महानगरपालिका गंभीर नाही - आमदार संजय केनेकर

शहरातील पाणिपुरवठा बाबत महानगरपालिका गंभीर नाही - आ.केनेकर

छत्रपति संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा व हिंदू-मुस्लिमांच्या ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी दाहिदशा यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधिंवर निघत आहे.

महापालिका प्रशासकिय विभागातील आपसातील समन्वयांच्या अभावाने ही समस्या उभी ठाकली आहे असे मत आमदार संजय केनेकर यांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेच्या आयुक्त जी श्रीकांत यांना लिहिलेल्या पत्रात पाणीपुरवठयाच्या समस्येवर संबंधित विभाग व लोकप्रतिनिधि यांची तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी आ.केनेकर यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow