सद्भावना ईद मिलन कार्यक्रमाची गरज - आमदार विक्रम काळे

सद्भावना ईद मिलन कार्यक्रमाची गरज - आमदार विक्रम काळे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) समाजात भाईचारा व बंधुभाव एकात्मता वाढवण्यासाठी सद्भावना ईद मिलन सारख्या कार्यक्रमाची गरज आहे. सद्भावना मंचने हा कार्यक्रम घेत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे कार्यक्रम नेहमी घेण्याची गरज आहे असे वक्तव्य आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना आमदार विक्रम काळे यांनी केले.
सद्भावना मंच यांच्या वतीने मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या हॉलमध्ये सद्भावना दिन व ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जावेद मुकर्रम (जमाअत-ए-इस्लामी हिंद सेंट्रल कमिटीचे सदस्य) होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विक्रम काळे, भिक्खू विशुद्धानंद महाराज (बौद्ध विहार, विद्यापीठ), राजेंद्र दाते पाटील, कोल्हे आबा महाराज, बिशप आर. बी. गायकवाड, इंजिनिअर वाजिद कादरी, अॅड. अभय टाकसाळ, सलमान सिद्दीकी (शहराध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद), निसार देशमुख, प्रवीनायादव (वेदांत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "सद्भावना दिनासारखे कार्यक्रम सर्वांनी घ्यायला हवेत. आज आपल्याला जातीवादाची नव्हे तर प्रेम आणि ऐक्याची गरज आहे."
भिक्खू विशुद्धानंद महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "ईश्वर काहीही नाही, सर्वकाही निसर्ग आहे."
बिशप यांनी म्हटले की, "ईसा मसी हे देवाचे पुत्र आहेत."
वाजिद कादरी यांनी सांगितले, " पृथ्वीतला वर सर्वात उच्च स्थान मनवाला आहे तुम्ही एका ईश्वराशिवाय कोणाच्याही पुढे झुकणार नाही.ही जमीन, पर्वत, सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, झाडं, प्राणी, पक्षी – हे सर्व काही अल्लाहने माणसाच्या सेवेसाठी निर्माण केले आहे. त्यांच्या पुढे झुकणे म्हणजे स्वतःची श्रेष्ठता कमी करणे होय.."
कोल्हे महाराज यांनी म्हटले, "सर्वांचा देव एकच आहे आणि सर्वांनी प्रेमाने राहावे."
अध्यक्षीय भाषणात मी जावेद मुकर्रम यांनी सांगितले की, " आपला देश खूप विशेष आहे, आमच्याकडे काम करण्यासाठी खूप संधी आहेत. पण जी गोष्ट आमच्या देशात घूणप्रमाणे आमच्या शक्तीला खात आहे, ती म्हणजे द्वेष. या द्वेषामुळे देशाची प्रगती होत नाहीये. आपण या द्वेषाचा नाश करण्यासाठी व्यवहारात काम केले पाहिजे. आपण एकमेकांचे हमदर्द बनले पाहिजे, एकमेकांच्या कामी आले पाहिजे. समाजात उभ्या केलेल्या द्वेषाच्या भिंती ढासळवल्या पाहिजेत, तरच आपला देश प्रगती करेल!."
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेख पशू सर यांनी केले. आभार मिर्झा सलिम बेग यांनी मानले. कार्यक्रमात देशबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, तसेच महिलांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
What's Your Reaction?






