सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिंग्या राहत असल्याच्या किरीट सोमय्या यांच्या दाव्याने खळबळ...!

 0
सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिंग्या राहत असल्याच्या किरीट सोमय्या यांच्या दाव्याने खळबळ...!

सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिंग्या राहत असल्याच्या किरीट सोमय्या यांच्या दाव्याने खळबळ...!

अगोदर रावसाहेब दानवे यांचे पाकिस्तान असल्याचा आरोप आणि आता सोमय्यांच्या दाव्याने राजकारण तापणार...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिंग्या राहत असल्याच्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन जन्मदाखल्यासाठी लावलेल्या कागदपत्रांची छाननी पारदर्शक करण्याची सूचना दिल्या आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. त्यांनी बोलताना सांगितले सन 2024 पासून जन्मदाखला देण्याचे अधिकार तहसीलदार यांना शासनाने दिले आहे. काही महीन्यांत छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातून 10 हजार 68 अर्ज जन्मदाखल्यासाठी प्राप्त झाले आहे यापैकी सिल्लोडमधून 4730 अर्ज तहसील कार्यालयात प्राप्त झाले आहे. यामध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांचे अर्ज असल्याची भीती किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त केली आहे. काँग्रेस, उध्दव ठाकरे यांची शिवसेना व एमआयएम पक्षाच्या वतीने राजकीय दबाव आणून त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळवून दिले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. रोहिंग्यांचे समर्थन कोणी करु नये असे आवाहन त्यांनी केले. राज्यात चार महीन्यात दोन लाखांहुन अधिक अर्ज तहसीलदार यांच्या कार्यालयात प्राप्त झाले आहे यामध्ये 90 टक्क्याहुन अधिक पुरावे बोगस आहे. मालेगाव व अमरावती येथे छाननीत धांदली झाली आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटी नेमली अशी एसआयटी राज्यासाठी नियुक्त करण्याची मागणी करणार आहे. बांगलादेशातील रोहिंग्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळाले तर भारताचे नागरिकत्व मिळेल म्हणून राज्यातील 17 जिल्ह्याचा दौरा करून प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन लाख बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र देणे हे पण जिहाद आहे. हा वोट जिहादचा पार्ट टु आहे असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे. मालेगावात गेलो असता काँग्रेसचे खासदारांनी काळे झेंडे दाखवले. भाजपाला मत दिले नाही तर वोट जिहाद आहे का हा प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले वोट जिहादचा पार्ट वन मालेगाव येथे झाला. मालेगाव हे वोट जिहादचे सेंटर आहे. नाशिक कोऑप मर्चंट बँकेत 14 हिंदूंच्या नावे बँक खाते उघडून त्या व्यक्तीने आपल्याकडे वळवून 2200 कोटींचा घोटाळा केला त्यामधील 379 कोटी अशा प्रवत्तीवर खर्च केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सिल्लोडला अगोदर रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तान म्हणून टिका केली होती यामुळे चर्चेत असलेल्या सिल्लोडला बांगलादेशी रोहिंग्या राहत असल्याच्या किरीट सोमय्या यांच्या दाव्याने राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow