सुर्यवंशी कुटुंबाला आंबेडकर न्याय मिळवून देणार, आंबेडकर औरंगाबाद खंडपीठात दाखल...

सुर्यवंशी कुटुंबाला आंबेडकर न्याय मिळवून देणार, आंबेडकर औरंगाबाद खंडपीठात दाखल...या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) स्व.सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाॅम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. जोपर्यंत सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार असल्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसची आज 8 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी आहे. एड प्रकाश आंबेडकर स्वतः या केसमध्ये न्यायालयासमोर बाजू मांडणार आहे यासाठी ते न्यायालयात दाखल झाले आहेत. सुनावणीनंतर कळेल काय झाले या केसमध्ये.
What's Your Reaction?






