आदित्य ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी संवाद साधणार
जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे साधणार संवाद...
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्नही समजून घेणार...
औरंगाबाद,दि.14(डि-24 न्यूज) शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे दिनांक 15 रोज जिल्ह्याच्या दौरा करणार असून यामध्ये ते औरंगाबाद, पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी शेत प्रश्न संदर्भात संवाद साधणार आहेत. यावेळी ते प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते व शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.
औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सकाळी 11.30 वाजता, पैठण तालुक्यातील लोहगांव येथे दुपारी 12.45 वाजता, गंगापुर तालुक्यातील गुरुधानोरा येथे दुपारी 1.30 वाजता व वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथील शेतकऱ्यांसमवेत दुपारी 2.30 वाजता ते संवाद साधणार आहेत.
जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस झालेला असला तरीही मध्यंतरी एक महिना पावसाने पाठ फिरवली होती. या काळामध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. परंतु शासनाने या नुकसानीची अग्रीम भरपाई देण्याचे आश्वासन दिलेले असले तरीही मदत पोहचलेली नाहीत. हीच सद्य परिस्थिती समजून घेण्यासाठी ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
What's Your Reaction?