शहराची भरभराट होण्यासाठी शहर स्वच्छ असणे आवश्यक - मनपा प्रशासक जी श्रीकांत
शहराची भरभराट होण्यासाठी शहर स्वच्छ असणे आवश्यक- मनपा प्रशासक जी श्रीकांत
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज )
वाहन बनवणारी टोयोटा कंपनी शहरात येत आहे ही बाब शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण आपण आपल्या शहराला इतके स्वच्छ करू की प्रत्येक कंपनीची आपल्या शहरांमध्ये युनिट टाकण्याची इच्छा व्हावी असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज केले. एक तास स्वच्छतेसाठी या महास्वच्छता अभियानाची सुरुवात आज सकाळी आठ वाजता क्रांती चौक येथून करण्यात आली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते ते पुढे म्हणाले की प्रत्येक नागरिक विद्यार्थी आणि घटकांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी घर स्वच्छ ठेवून घराच्या आसपासच्या 200 मीटर परिसरात जे काही इमारत ऐतिहासिक वारसा परिसर आहे ते त्यांनी स्वच्छ ठेवावे. आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास 17 लाख आहे आणि आपले सफाई कर्मचाऱ्यांची संख्या फक्त 3000 आहे या मानाने 100 नागरिकांमागे एक सफाई कर्मचारी असा रेशो आहे. सदरील अंतर कमी करण्यासाठी शहरातील प्रत्येक घटकाच्या सहभाग असणे गरजेचे आहे ते म्हणाले. साफसफाई ठेवली तर याच्यात सगळ्यांच्या फायदा आहे एक तर शहर स्वच्छ आणि चकचकीत दिसले तर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि शहरातील नागरिक पण रोगराई पासून दूर राहतील प्रशासक म्हणाले. महानगरपालिकेतर्फे दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत एक तास स्वच्छता साठी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.याची सुरुवात आज सकाळी आठ वाजता क्रांती चौक येथून झाले सदरील कार्यक्रमात महानगरपालिकेचे सर्व अधिकारी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, एनजीओ कॅन्टोन्मेंट बोर्ड चे कर्नल बीजी प्रदीप ,माजी नगरसेवक किशोर नागरे ,माजी नगरसेविका कीर्ती शिंदे ,तसेच मासिया आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला यावेळी किराडपुरा प्राथमिक शाळा व एमआयटी कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी घनकचरा व्यवस्थापन बाबत पथनाट्य सादर केले.यावेळी महानगरपालिकेच्या एकूण 15 शाळेच्या जवळपास 800 विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. अनमृत फाउंडेशन तर्फे सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काकासाहेब जाधव यांनी हम होंगे कामयाब हे गीत उपस्थितांकडून म्हणवून घेतले. तसेच स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि स्वच्छतेची प्रतिज्ञा बॅनरवर मान्यवरांनी सह्या देखील केल्या. या नंतर क्रांती चौक ते पैठण गेट पर्यंत स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी केले तर सूत्र संचालन मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केले.
जनजागृती रॅलीची सांगता. पैठण गेट येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सायलेन्सर काढून तयार करण्यात आलेली वस्तूचे उद्घाटन
यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शहरातील मोटरसायकलला जास्त आवाज करणारे सायलेन्सर काढून त्यांच्यातून एक सुंदर अशी वस्तू तयार केली आणि तो क्रांती चौक येथील दुभाजकामध्ये मध्ये लावण्यात आली. याचे अनावरण देखील वर नमूद मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
What's Your Reaction?