देशाचे राष्ट्रगीत जण गण मण नाही तर वंदेमातरम पाहिजे - रामगिरी महाराज
देशाचे राष्ट्रगीत जण गण मन नाही तर तर वंदे मातरम पाहिजे - रामगिरी महाराज
गोधा धामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे विधान
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)
1911 मध्ये कोलकाता या ठिकाणी राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज पंचम यांची स्तुती करताना जनगणमन हे राष्ट्रगीत गायले होते. पंचम यांनी भारतावर अनेक अन्याय अत्याचार केले आहे त्यामुळे भारताचे खरे राष्ट्रगीत
देशाचे खरे राष्ट्रगीत जनगणमन नाही तर वंदे मातरम असले पाहिजे असे विधान गोदा धामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केले. तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असेही महंत रामगिरी म्हणाले. अयोध्येनंतर मथुरा काशी बद्दल त्यांनी यावेळी वक्तव्य केले. राष्ट्रगीतावर त्यांनी केलेले वक्तव्य आणखी वाद वोढवून घेणारे आहे. त्यांनी असले वक्तव्य करुन राष्ट्रगिताचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या मनात व्यक्त होत आहे. याअगोदर त्यांनी मुस्लिम धर्माबद्दल वक्तव्य केल्यानंतर वाद उफाळून आला होता व 60 हुन अधिक गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. तरीही त्यांच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.
साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. - रामगिरी महाराज
‘मिशन अयोध्या' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या' हा चित्रपट 24 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, 7 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे पार पडला.
साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले
आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असे दाखवले गेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधुसंता बद्दल चांगले दाखविण्यात येत आहेत, असे म्हणत त्यांनी, मिशन अयोध्या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. मंगळवारी (दि.7) सायंकाळी शहरातील एका माॅलमध्ये मिशन अयोध्या या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी बोलत होते. भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल, असेही महाराज म्हणाले. यावेळी व्यसपिठावर आमदार अनुराधा चव्हाण, चित्रपटाचे निर्माते, कृष्णा शिंदे, योगीता शिंदे, दिग्दर्शक समीर सुर्वे आदींची उपस्थिती होती.
या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच रामगिरी महाराज यांच्या अनुयायांनीही बहुसंख्येने गर्दी केली होती. ज्ञानोबा - तुकाराम माऊलींचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम' नामाचाही जयघोष केला. तसेच यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती. तसेच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी ला
वण्यात आले होते.
What's Your Reaction?