भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी वंचितने काढली तिरंगा रॅली...

तिरंगा रॅलीने वेधले शहराचे लक्ष...भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी वंचितने काढली तिरंगा रॅली...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशान्वये दिनांक 11 मे 2025 रोजी औरंगाबाद शहरात बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिंदाबाद जिंदाबाद भारत जिंदाबाद जिंदाबाद... जिंदाबाद हमारा भारत जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातीत तिन्ही दलाच्या सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा झेंडा आणि भारत जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हा अध्यक्ष योगेश गुलाबराव बन, महिला जिल्हा अध्यक्ष लताताई बामणे, पश्चिम शहर अध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा प्रसीद्धीप्रमुख भाऊराव गवई, मनोज वाहूळ, महिला शहर अध्यक्ष वंदना जाधव, सोशल मिडिया प्रमुख प्रवीण जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख गणेश खोतकर , जिल्हा सदस्य रवी रत्नपारखे पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, सुलोचनाताई साबळे कोमल हिवाळे, सुनयना मगर, ॲड पुष्पा घोडके, साधना पठारे, वैशाली राणेकर विजय पठारे, राजू कांबळे, निशांत वानखेडे, ॲड एम एन धंदर ,एन टी सुरवसे, नवाब साहेब, ज्ञानेश्वर त्रिभुवन, ऋषीकेश त्रिभुवन. आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






