क्रांतीचौकात भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी जल्लोष, विर जवानांना वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली...

 0
क्रांतीचौकात भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी जल्लोष, विर जवानांना वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली...

सीमेवर लढणाऱ्या सैनिकाबद्दल छत्रपती संभाजीनगरकरानी व्यक्त केली कृतघ्नता...

पाकड्यांना नामोहरम केल्याबद्दल क्रांती चौकात जल्लोषाचे वातावरण...

शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली, प्रसिध्द गायक वाजेद अन्सारी व सहका-यांनी देशभक्तीपर गीत सादर करत दाद मिळवली...

 छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात 26 भारतीय नागरिक हुतात्मा झाले होते. याचे चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानातील सर्व आतंकवादी तळ ऑपरेशन सिंदूर राबवून उध्वस्त केले. पाकड्यांची सुरक्षा व्यवस्था उध्वस्त करण्यात आली. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानने केलेले हल्ले परतवून लावले. याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आज आपण सुरक्षित आहोत दोन वेळचे जेवण करू शकतो , रात्री शांत झोपू शकतो ते फक्त आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकामुळेच , या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत याची जाण ठेवत भारतीय सैनिकांबद्दल कृतघ्नता वक्त करणे आपले कर्तव्य आहे. याकरिता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने शहरातील मध्यवर्ती ठिकाण क्रांती चौक या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी देश सेवेमध्ये शहीद झालेल्या जवानांना विरचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित माता भगिनी व नागरीकांच्या हातात भारताचा तिरंगा मान उंचावून फडकत होता.

 याप्रसंगी सर्व जाती पाती, धर्म ,राजकीय पक्ष बाजूला ठेवून भारतीय सैनिकांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी एकत्र आले होते.

 देश मेरा रंगीला, सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हमपे डालो , ये देश है वीर जवानो का.. या देश भक्ती पर सादर करण्यात आलेल्या गीतांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. यावेळी तरुण युवक युवती , माता भगिनी , नागरिक हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल सैन्याचे आभार मानले. विशेष करुन कर्नल सोफिया कुरेशीने ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी शहीद जवानांची वीर पत्नी व सैन्यात विशेष पदांवर देशाची सुरक्षा करणारे कमांडर, कर्नल व सेवानिवृत्त सैनिकांची उपस्थिती होती. सैन्यात सेवा बजावणा-या सैनिकांची पत्नी व काही सैन्य अधिका-यांनी आपले विचार मांडले. सिमा गणेश थोरात, कमल राजु गायकवाड या वीरपत्नींनी मनोगत व्यक्त केले.

भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे , खासदार कल्याण काळे, खासदार भागवत कराड, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब , माजी मंत्री राजेंद्र दर्डा, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक विनय राठोड, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, आरएसएसचे देवजीभाई पटेल , गणेश महासंघाचे पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, विकास जैन, हर्षदाताई शिरसाट, जालिंदर शेंडगे, व्यापारी संघटनेचे महावीर पाटणी, व्यापारी संघटनेचे विजय जैस्वाल, शिवाजी बनकर , राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहर कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम, बबन डिडोरे , विजय वाघचौरे , प्रा . संतोष बोर्डे, शिल्पा राणी वाडकर आदींची उपस्थिती होती

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow