मुस्लिम बांधवांनी काळी फीत लावून अदा केली नमाज, जोपर्यंत कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार...?

मुस्लिम बांधवांनी काळी फीत लावून अदा केली नमाज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) केंद्र सरकारने पारीत केलेल्या वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात आज देशभरात शुक्रवारची नमाज मुस्लिम बांधवांनी काळी फित बांधून पठण केली. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक मस्जिदमध्ये बाह्याला काळी फित बांधून नमाजसाठी मुस्लिम बांधव दाखल झाले होते. जोपर्यंत हा कायदा सरकार मागे घेणार नाही हे आंदोलन सुरू राहणार आहे. हा कायदा संविधान विरोधी आहे म्हणून पाच ते सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. 16 एप्रिल पासून या प्रकरणी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास यावेळी माहिती देताना उपस्थितांनी दिली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून देशातील विविध राज्यात आंदोलन सुरू आहे
.
What's Your Reaction?






