शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठा मावळा संघटना अक्रामक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठा मावळा संघटना अक्रामक...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.2(डि-24 न्यूज) राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, सातबारा कोरा करावा या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेकडून शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दुपारी बारा ते अडीच वाजेदरम्यान संघटनेने शेतकऱ्यांचे कर्ज-बिजबील माफ करा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तालयाचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सरकारने जर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर लवकरच मुंबईला मंत्रालयावर हजारो शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज यासह कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा. पीक विम्यातील त्रुटी दूर करून एक रुपयात पिक विमा पुन्हा सुरु करावा. सोयाबीनला प्रतिक्विंटल 6500 रुपये भाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे हनुमंत कदम, गणेश वडकर, विजय म्हस्के, रघुनाथ शिंदे, पंढरीनाथ गोडसे, नंदकुमार साळुंके, विजय कदम, भरत कदम, कल्पना चव्हाण, रंजना कोलते, उदयराज गायकवाड, प्रशांत सुरवसे यासह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
What's Your Reaction?






