समाजकल्याणच्या निधीसाठी कर्नाटक प्रमाणे कायदा करावा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

 0
समाजकल्याणच्या निधीसाठी कर्नाटक प्रमाणे कायदा करावा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

समाज कल्याणच्या निधीसाठी कर्नाटक प्रमाणे कायदा करावा... 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची मागणी... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.15(डि-24 न्यूज) समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणी योजनेकडे वळविल्याने दलित समाजामध्ये मोठी नाराजी आहे समाज कल्याणचा निधी इतर खात्याकडे वळवू नये यासाठी कर्नाटक सरकारने कायदा केला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही समाज कल्याणच्या निधीच्या संरक्षणासाठी कायदा करावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज गुरुवार दिनांक 15 मे रोजी एका पत्रकार परिषदेत केली.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, दौलत खरात, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवचरमल, संजय ठोकळ श्री.पादमुख राकेश पंडित मनोज सरिन आदी उपस्थित होते.

 केंद्रीय मंत्री आठवले हे गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आज त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले अनुसूचित जाती जमातीसाठी संविधानाने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष निधीची तरतूद केली आहे समाज कल्याणचा 400 कोटी पेक्षा जास्त निधी लाडक्या बहिणी योजनेकडे वळवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहावी त्याला आमचा विरोध नाही उलट राज्य सरकार 1500 ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणीला देणार आहे एका प्रश्नावर बोलताना श्री. आठवले म्हणाले सामाजिक न्याय खात बंद करू नये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केलेले वक्तव्य हे संतापाच्या भरात केले आहे. 

पाकव्यात काश्मीर ताब्यात घ्यावा... 

पाकिस्तान सोबत युद्ध थांबले असले तरी मोदी यांनी चांगली भूमिका घेतली आहे. अतिरेक्यांना प्रशिक्षण देणारे अतिरेक्यांचे अड्डे भारतीय सैनिकांनी उध्वस्त केले. भारतीय सैनिकांचे हल्ले आणि पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तान रडकुंडीला आला यामुळे त्यांच्या पंतप्रधानांनी युद्ध नको अशी भूमिका घेतली आणि युद्ध थांबवण्याचे आवाहन केले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धबंदी जाहीर केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धबंदीत कोणतीही भूमिका नाही पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पंतप्रधान मोदी नक्कीच प्रयत्न करतील असे ते म्हणाले विरोधी पक्षांनी या प्रश्नावर राजकारण करू नये असेही आठवले म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घ्यावे तरच आतंकी कारवाया थांबतील अशी पक्षाची भुमिका लोकसभा व राज्यसभेत मी मांडलेली आहे. असे आठवले म्हणाले. 

राज उद्धव एकत्र येऊ शकते तर आम्ही का नाही 

राज ठाकरे उद्धव ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे यावर बोलताना श्री. आठवले म्हणाले राज आणि उद्धव कधीच एकत्र येऊ शकत नाही ते जर एकत्र आले तर महाविकास आघाडीला फटका बसू शकतो आणि महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे शरद पवारांना आजित पवारांची भूमिका मान्य करावी लागेल. शरद पवारांनी देशाचा विचार करावा राज आणि उद्धव एकत्र येत असेल तर सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी याबाबत आता विचार केला पाहिजे ते जर एकत्र येत असेल तर मी माझ्या मंत्रीपदावर पाणी सोडण्यास तयार असल्याचे श्री आठवले म्हणाले.

 

महापालिकेत रिपाईला दहा ते बारा जागा सोडाव्यात... 

 सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती तील घटक पक्ष एकत्र लढवणार आहे. रिपब्लिकन पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत जागा सोडाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात येईल. छत्रपती संभाजी नगर महापालिकेत पक्षाला दहा ते बारा जागा सोडवाव्यात अशी मागणी श्री. आठवले यांनी यावेळी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow