इम्तियाज जलिल यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाज उतरणार रस्त्यावर...

इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरणार...
एकेकाळी एमआयएममध्ये असलेले अरुण बोर्डे इम्तियाज जलिल यांच्या अटकेची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत दलित समाजाला उद्देशून ‘हरिजन’ शब्द वारंवार वापरला. दलित समाजाला हिणविण्याच्या उद्देशाने त्यांनी ही कृती केली. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल असून जलील यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी 23 जून रोजी शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने अरुण बोर्डे यांना आज पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना ज्येष्ठ नेते दौलत खरात आणि मिलिंद शेळके म्हणाले पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी खरेदी केलेल्या जागेच्या कथित गैरव्यवहाराबाबत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. नियमानुसार ‘हरिजन’ समाजाची जागा दुसऱ्याला हस्तांतरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी लागते, असा उल्लेख जलील यांनी केला होता. या वक्तव्यातील ‘हरिजन’ शब्दाला आंबेडकरी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. जलील यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून त्यांना अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘हरिजन’ शब्द व्यवहारातून वगळण्यात आला आहे. केंद्र सरकारचे परिपत्रकसुद्धा आहे. तरीही जलील जाणीवपूर्वक दलित समाजाची बदनामी करीत आहे’, असे सतीश पट्टेकर म्हणाले. ‘दलित मतदारांच्या पाठबळावर जलील खासदार झाले होते. अन्यथा, ते दहा पिढ्यासुद्धा खासदार झाले नसते. त्यांनी त्याच मतदारांच्या भावना दुखावल्या आहेत’. शासकीय कागदपत्रात ‘हरिजन’ उल्लेख असल्यामुळे तोच शब्द वाचल्याचा प्रतिवाद जलील करीत आहेत. पण, शासकीय कागदपत्रे जुनी आहेत. ती वाचण्यापूर्वी त्यातील उल्लेखाची माहिती देऊन नंतर वाचणे अपेक्षित होते. आक्षेपार्ह शब्द उच्चारण्याची आवश्यकता नव्हती, असे खरात म्हणाले. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्यामुळे जलील यांना अटक करावी, या मागणीसाठी 23 जून रोजी क्रांती चौक ते भडकल गेट असा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली. शहरातील मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना शासनाच्या वतीने अर्थ सहाय्य मिळाले आहे त्यात वैयक्तिक संजय शिरसाठ यांचा कोणताही सहभाग नाही तरी देखिल आंबेडकरी समाजातील या तरुण उद्योजकांना त्यांचा लोकसभेत झालेल्या पराभवाची चीड डोक्यात ठेऊन वेगवेगळे जातीवाचक शब्द वापरुन बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत आहे. इम्तियाज जलिल व संजय सिरसाठ यांच्या सुरु असलेल्या भांडणाशी आमचे काही देणेघेणे नाही. सिरसाठ यांच्या मालमत्ते प्रकरणी तो शब्द वापरुन व आंबेडकरी समाजातील तरुण उद्योजकांना गँग हा शब्द वापरुन जलिल यांनी जातीय भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आहे त्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार असल्याचे अरुण बोर्डे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अमित भुईगळ, किशोर थोरात, जालिंदर शेंडगे महेंद्र सोनवणे, अरुण बोर्डे, चंद्रकांत हिवाळे, संजय ठोकळ, सचिन बोर्डे, सुनील मगरे, विनोद बनकर, राहुल सोनवणे, लक्ष्मण शिंदे लक्ष्मण हिवराळे, विजय जोंधळे, सतीश पटेकर, बाळकृष्ण इंगळे, भगवान रगडे, सुनील कोटकर, मनोज सिरीन, राहुल सावंत, सुधाकर बागुल, प्रेम चव्हाण, गौतम जमधडे, संतोष भिंगारे, कृष्णा भंडारे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






