मुकुंदवाडी घटनेतील आरोपिला जामिन आणि निरपराधांचे संसार उघड्यावर, आंदोलकांचा आरोप...!

मुकूंदवाडीतील अतिक्रमण कारवाईच्या
विरोधात बाधित नागरीक रस्त्यावर...
नुकसानभरपाई देण्याची मागणी, हजारो लोकांचा पोट भरत असलेल्या व्यवसायिकांचा रोजगार हिरावून घेतल्याचा आरोप...आरोपिला जामिन मिळाले आणि प्रशासनाने निरपराधांना कार्यवाही करत शिक्षा दिल्याचा आरोप येथील नागरीकांनी केला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21 (डि-24 न्यूज) मुकूंदवाडीत तरुणाचा खून करीत दोघांना गंभीर जखमी केल्याच्या कारणामुळे गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी महानगरपालिकि व पोलीस प्रशासनाने मुकूंदवाडी-चिकलठाणा परिसरात सर्व्हिस रोड मोकळा करण्याचे कारण पुढे करीत अतिक्रमण काढण्यासाठी गोरगरीबांच्या घरावर बुलडोझर चालवला असा आरोप करत नागरिकांनी आज आज सकाळी मनपा-पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. भाजप सरकार मुर्दाबाद, मनपा, पोलीस प्रशासन मुर्दाबाद, गोरगरीबांच्या रोजगारावर पाय देणार्या प्रशासनाचा निषेध असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
मुकूंदवाडी परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा खून करत दोघांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे शहर हादरले. मुकूंदवाडी भागात अंमली पदार्थांची विक्री, चरस, गाजा, दारू, बटन विक्रीचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीसांकडून कारवाई केली जात नव्हती. मात्र, तरुणाचा खून होताच पोलीस प्रशासनाची नाचक्की होत असल्यामुळे पोलीस आणि मनपा प्रशासनाने मुकुंदवाडी ते चिकलठाणा येथील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. गेल्या 25 वर्षापासून ही अतिक्रमणे झालेली असताना यापूर्वी सिडको व मनपा प्रशासनाने कधीही कारवाई केली नाही. सिडकोने 100 फुट हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोजून दिला. त्यानंतर व्यापारी संकुल बांधण्यास परवानगी दिली. परंतु, मनपाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यापूर्वी कागदपत्राची तपासणी केली नाही. नवीन शासन निर्णय आल्याचे सांगून ही कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला. एका राजकीय नेत्याच्या हॉटेलसाठी ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजपाच्या तीन आमदारांनी राजकीय दबाव आणून कार्यवाई करायला लावली असाही आरोप आंदोलकांनी केला. मुकूंदवाडी व चिकलठाणा येथे अतिक्रमणे काल 229 अतिक्रमणांवर हातोडा चालवला यामुळे शेकडो लोकांचा रोजगार हिरावून घेतला. हजारो लोकांचे पोट या व्यवसायावर चालत होते. घरातील सामान सुध्दा काढायला वेळ दिला नाही. नोटीस न देता अतिक्रमणे काढण्यात आली. सरकारने नुकसानभरपाई देत पर्यायी जागा द्यावी काही लोक या जागेवर 50 वर्षांपासून वास्तव्यास होते त्यांचे संसार उघड्यावर आणले आहे. कार्यवाईच्या वेळी घर पडत असताना लहान बालके, आई वडील, जेष्ठांच्या डोळ्यातील अश्रू बघून मन हेलावून गेले. सरकारने न्याय दिला नाही तर न्यायालयात दाद मागणार आमच्याकडे मालमत्तेची कागदपत्रे आहेत. एमआयडीसीच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत. असा सवाल नागरिकांनी यावेळी केला. अतिक्रमण हटविण्यास विरोध नाही, मात्र पूर्वसूचना देणे किंवा कागदपत्राची तपासणी करूनच कारवाई केली असतीतर अनेकांची घरे वाचली असती.
पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे खूनाच्या आरोपींना जामीन मिळाला. त्यामुळे खून झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत करावी, जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये द्यावेत, अतिक्रमण हटविण्यासाठी शासनाने काढलेला नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करावा, विमानतळापासून ते बाबापेट्रोलपंपापर्यंतचा दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड मोकळा करावा, मोठमोठ्या व्यवसायिकांच्या इमारती देखील हटविण्यात याव्यात, रोजगार बुडणार्या बेरोजगारांना अनुदान द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात मुकूंदवाडीतील कमलाकर जगताप, भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब डांगे, हनुमान शिंदे, मोतीलाल जगताप प्रशांत जगताप, संजय जगताप, बन्सी कुचे, हारुण कुरेशी, बाळू साळवे, दादाराव जगताप, गणेश गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेै.
What's Your Reaction?






