वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात आमखास मैदानावर जमणार लाखोंचा जनसमुदाय...!

 0
वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात आमखास मैदानावर जमणार लाखोंचा जनसमुदाय...!

वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात जमणार लाखोंचा जनसमुदाय....!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)

नवीन वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने देशभर आंदोलन सुरु आहे त्याचाच एक भाग म्हणून ऐतेहासिक आमखास मैदानावर 25 मे रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत वक्फ संरक्षण काॅनफन्सचे आयोजन करण्यात आले आहे. वक्फ संशोधन कायदा रद्द करावा या मागणिसाठी आयोजित जाहिर सभेत लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या काॅनफरन्स मध्ये प्रमुख उपस्थिती मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना उमरैन महफुज रहेमानी, मौलाना यासिन अली उस्मानी बदायूनी, अॅड शमशाद, मौलाना रफीऊद्दीन अशरफी, मौलाना निजामोद्दीन फक्रुद्दीन, मलिक मोअतसिम खान, खासदार इम्रान प्रतापगढी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, वंचितचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर, खा.डाॅ कल्याण काळे, माजी खासदार इम्तियाज जलिल, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना मोईजोद्दीन कासमी, मौलाना महेफुजुर्रहमान फारुकी, इंजिनिअर वाजेद कादरी, जियाउद्दीन सिद्दीकी यांनी दिली आहे.

हजरत मौलाना मोईजोद्दीन कासमी यांनी सांगितले वक्फ संशोधनाच्या विरोधात लाखोंचा जनसमुदाय आमखास मैदानावर जमणार आहे. देशभरातील मुस्लिम समाजाचा या वक्फ सुधारणा कायद्याला विरोध आहे. सरकारने मुस्लिम समाजाच्या धार्मिक मालमत्तांवर गंडांतर आणले तशाच प्रकारे अन्य धर्माच्या धार्मिक स्थळांवर सुध्दा अशा प्रकारे कायदे लादण्याची भीती आहे. वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करुन जबरदस्ती लादण्यात आलेल्या वक्फ कायदा मागे घ्यावा. जोपर्यंत हा कायदा सरकार मागे घेणार नाही मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने देशभर असेच आंदोलन सुरु राहणार आहे. वक्फ संरक्षण काॅनफरन्सचे आयोजन हा कायदा रद्द करावा यासाठी करण्यात येणार आहे. यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाचे जवाबदार पदाधिकारी व विरोधी पक्षातील नेते या जाहिर सभेत आपले मत मांडणार आहे. या सभेचा उद्देश हाच आहे की शांतीपूर्ण पध्दतीने या गोष्टींकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल की हा काळा कायदा संविधान विरोधी, अल्पसंख्यांक विरोधी, मुस्लिम विरोधी आहे त्यामुळे वक्फच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे सरकारने तो त्वरीत मागे घ्यावा. वक्फ सुधारणा कायद्यात केलेल्या दुरुस्त्या भेदभाव पूर्ण आहेत. भारतीय संविधानाने दिलेले मुलभुत अधिकारांचे उल्लंघन करतात. या दुरुस्त्या भारतीय संविधानाच्या कलम 14,25,26 आणि 29 च्या विरोधात आहेत. जे समानता आणि धार्मिक स्वातंत्र्याची हमी देतात. नवीन कायद्यात wakf by user, वक्फ बोर्डात इतर धर्माचे सदस्यांची नियुक्ती, वक्फ साठी दान करणा-या वर पाच वर्ष मुसलमान होणे अनिवार्य करणे, अवैध ताबा करणा-यांची शिक्षा कमी करणे, वक्फ ट्रिब्युनलचे अधिकार कमी करणे, जिल्हाधिकारी यांचा वक्फ मालमत्तेत हस्तक्षेपाचा अधिकार यामुळे वक्फच्या अनेक मालमत्तेवर धोका निर्माण झाला आहे या विषयावर उपस्थित मान्यवर आपले मत मांडणार आहे.

पत्रकार परिषदेत हाफिज अब्दुल अजिम, ख्वाजा शरफोद्दीन, शेख युसुफ, डाॅ.शोएब हाश्मी, तय्यब जफर, मौलाना अब्दुल शुकुर, हाफिज शरीफ निजामी, एड जकीयोद्दीन, अब्दुल हयी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow